शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मुक्ताईनगर तालुक्यात वाघांचा प्राचीन काळापासून अधिवास, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:13 IST

प्राचीन शाश्वत संचार मार्ग

ठळक मुद्दे१८२२मध्ये खान्देशात सुमारे ५०० व्यक्तींचा आणि २०००० गुरांचे बळी वाघांनी घेतल्याची नोंद मे, जून, जुलै १८२२ मध्ये ६० वाघांना ठार करण्यात आले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - खान्देशात विशेषत: मुक्ताईनगर तालुक्यात वाघ आणि इतर वन्यजीवांचा अधिवास अतिशय प्राचीन काळापासून असून या विषयीच्या सुस्पष्ट नोंदी बॉम्बे गॅझेटिअरमध्ये आढळून आल्या आहेत. इतकेच नव्हे १९७०च्या सुमारास एका शेतात वाघाची शिकार झाल्याच्या घटनेलाही स्थानिक लोक उजाळा देतात.१८२२मध्ये खान्देशात सुमारे ५०० व्यक्तींचा आणि २०००० गुरांचे बळी वाघांनी घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे मे, जून, जुलै १८२२ मध्ये ६० वाघांना ठार करण्यात आले होते. तत्कालीन ब्रिटीश सरकारने वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मदतीला स्वतंत्र भिल सेना तयार केली होती. कारण खान्देशापासून संपूर्ण पश्चीम भारताचे क्षेत्र हे वाघ आणि इतर वन्यजीवांनी व्यापलेले होते. विशेषत: १८६२ नंतर उत्तरेला निमाड राज्यापासून (मध्यप्रदेश) पूर्व आणि दक्षिण पूर्वेला हत्ती हिल्स, दक्षिणेला सातमाळाची पर्वतराजी आणि पश्चिमेला डांग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाघांचा अधिवास होता असे, बॉम्बे गॅझेटिअरमध्ये म्हटले आहे. उल्लेख असलेले संचारमार्गांचे क्षेत्र म्हणजेच बॉम्बे गॅझेटिअरमध्ये उल्लेख केलेला हाच भूभाग होय. निमाड मध्यप्रदेशमध्ये पश्चिमेला विंद्य आणि सातपुड्याचा मध्यभागी वसलेले आहे.जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेकडील १२० कि.मी. क्षेत्र अजिंठा पर्वतराजिनी व्यापले आहे. महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणत: पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी दरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. पूर्णा नदीच्या खोड्यात पूर्वेकडे हत्ती हिल्स आहेत. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण पुर्वेकडे मुक्ताईनगर तालुक्यात ३२ किमी परिसर हत्ती हिल्सने व्यापला आहे. या वरून या क्षेत्रात वाघांचे अस्तित्व किती प्राचीन आहे, हे सिद्ध होते.डोलारखेडा नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे क्षेत्र स्वातंत्र्यत्तोतर कालखंडातही शिकारीसाठी प्रसिद्ध होते. येथे लांब लांबहून लोक शिकारीसाठी येत असत आणि ग्रामस्थाना बोलाविले जात असे. १९७०च्या सुमारास भागवत नागो इंगळे यांच्या शेतात वाघाची शिकार झाल्याची घटना आपल्याला आठविते, असे इंगळे आणि पंढरी पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव