शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापैकी ५० टक्के मुद्दलमध्ये माफ करून ५० टक्के आत जी वसुली होईल, त्यापैकी ३५ ...

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या थकित वीज बिलापैकी ५० टक्के मुद्दलमध्ये माफ करून ५० टक्के आत जी वसुली होईल, त्यापैकी ३५ टक्के ग्रामपंचायत ३५ टक्के वीज वितरण कंपनी आणि उर्वरित ३० टक्के रक्कम जिल्ह्यासाठी निधी म्हणून वापरला जावा, असा अत्यंत चांगला निर्णय घेतला असून ही वसुली २०२२पर्यंत करावी, असेदेखील निर्देश दिले असून या निर्णयाला शेतकऱ्यांचादेखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिलपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी थकबाकी भरलेली असली तरी आता ऐन मे महिन्यात मशागतीचे आणि लागवडीचे दिवस असताना विजेची कुठलीही समस्या निर्माण झाल्यास, ट्रान्सफार्मर- केबल जळाल्यास महावितरण कंपनी सक्तीने शेतकऱ्याकडून वसुली करीत आहे. कोरोना काळात शेतकरी हवालदिल झालेला असताना अशाप्रकारची वसुली करणे योग्य नसून आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव महावितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना अंदाजे बिल न देता शेतात मीटर आहे किंवा नाही, बागायत क्षेत्र किती, विहिरीला पाणी आहे किंवा नाही, किती प्रमाणात वीज पुरवठा त्या ठिकाणी करण्यात आला, याची माहिती घेण्यात येऊनच शेतकऱ्यांना ठरावीक मुदतीत बिल भरण्याची सूचना दिली जावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

एकाच ट्रान्सफार्मरवर असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करणेदेखील योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. थकित वीज बिल वसुलीसाठी २०२२पर्यंत मुदत असतानादेखील सक्तीने वीजबिल वसुली का केली जात आहे, असा सवाल देखील त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे. यावेळी प्रवीण ब्राह्मणे, स्वीय सहाय्यक राजू पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.