शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

महावितरणचा शॉक : वर्षभरात ४५ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

जळगाव जिल्हा : मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी एक, मक्तेदाराचे तीन तर इतर ३५ नागरिक जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना ...

जळगाव जिल्हा : मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी एक, मक्तेदाराचे तीन तर इतर ३५ नागरिक

जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात कुठे-ना कुठे विजेच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतच आहेत. यामध्ये महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ४५ व्यक्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असून, मक्तेदाराचे तीन कर्मचारी व इतर ३५ नागरिकांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडला आहे. तसेच मक्तेदाराकडील बाह्यस्रोत कर्मचारीदेखील कर्तव्यावर

असताना विजेच्या धक्का लागून मृत्युमुखी पडल्याच्या महावितरणकडे नोंदी आहेत. यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला महावितरणकडून आर्थिक मदत करण्यात आली असून, मक्तेदाराच्या कर्मचाऱ्याला मक्तेदाराकडूनच मदत करण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तर बाहेरील इतर नागरिकाचांही विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघातात महावितरणचा कुठलाही दोष नसून, संबंधित नागरिकाने महावितरणच्या डीपीला, विद्युत तारांना, घरामध्ये उपकरणे हाताळतांना आदी विविध

कारणामुळे मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी महावितरणकडे आहेत. त्यामुळे या नागरिकांना कुठलीही मदत देण्यात आली नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. जर विद्युत तार किंवा खांब अंगावर पडून, तसेच इतर कुठल्याही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अशा कर्मचाऱ्यानांच मदत देण्यात येत असल्याचेही महावितरणतर्फे सांगण्यात येते.

इन्फो :

विजेच्या धक्क्याने ५५ प्राण्यांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून विजेचा धक्का लागून पाळीव प्राण्यांचाही मृत्यू घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ५५ पाळीव प्राण्यांचा मृत्यू

झाला असून, ज्या ठिकाणी विद्युत तारा पडून पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत, अशा प्राणी मालकानांच आर्थिक मदत देण्यात आली आहे.

इन्फो :

महावितरण कर्मचाऱ्यानांही शॉक

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन विजेचे काम करून घेण्यात येते. मात्र, अनेकदा अचानक वीज पुरवठा सुरू होणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे महावितरणचे कर्मचारीच विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी झाला होता.

इन्फो :

विजेच्या धक्क्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, महावितरणतर्फे त्याचा पंचनामा केला जातो. यात महावितरणचा दोष होता की संबंधित व्यक्तीनेच विजेच्या तारांना किंवा डीपीला हात लावून मृत्युमुखी पडला.तसेच इतर कारणांचा अभ्यास केला होता. तरच मदतीस पात्र आहे की नाही, हे ठरविले जाते.

फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.

इन्फो :

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली मदत

१) विजेच्या धक्का लागून जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, या कर्मचाऱ्याला महावितरणच्या नियमानुसार आर्थिक मदत कुटुंबीयांपर्यंत देण्यात आली आहे.

२) तसेच विजेच्या धक्क्याने गेल्या वर्षात मक्तेदाराचे बाह्यस्त्रोत तीन कामगार मृत्युमुखी पडले. त्यांनाही संबंधित मक्तेदारातर्फे महावितरणच्या नियमानुसार त्यांच्या कुटुंबीयांना

मदत देण्यात आली आहे.

३) तसेच जे नागरिक विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले. त्यामध्ये झालेल्या पंचनाम्यानुसार किती व्यक्ती पात्र ठरले व किती जणांना मदत देण्यात आली, याबाबत सध्या आकडेवारी उपलब्ध नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.