शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

महावितरणचा शॉक : वर्षभरात ४५ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

जळगाव जिल्हा : मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी एक, मक्तेदाराचे तीन तर इतर ३५ नागरिक जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना ...

जळगाव जिल्हा : मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी एक, मक्तेदाराचे तीन तर इतर ३५ नागरिक

जळगाव : महावितरणतर्फे वेळोवेळी नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात कुठे-ना कुठे विजेच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतच आहेत. यामध्ये महावितरणने दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ४५ व्यक्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असून, मक्तेदाराचे तीन कर्मचारी व इतर ३५ नागरिकांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये महावितरणचा कर्मचारी कर्तव्यावर असताना विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडला आहे. तसेच मक्तेदाराकडील बाह्यस्रोत कर्मचारीदेखील कर्तव्यावर

असताना विजेच्या धक्का लागून मृत्युमुखी पडल्याच्या महावितरणकडे नोंदी आहेत. यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला महावितरणकडून आर्थिक मदत करण्यात आली असून, मक्तेदाराच्या कर्मचाऱ्याला मक्तेदाराकडूनच मदत करण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तर बाहेरील इतर नागरिकाचांही विजेच्या धक्याने मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघातात महावितरणचा कुठलाही दोष नसून, संबंधित नागरिकाने महावितरणच्या डीपीला, विद्युत तारांना, घरामध्ये उपकरणे हाताळतांना आदी विविध

कारणामुळे मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी महावितरणकडे आहेत. त्यामुळे या नागरिकांना कुठलीही मदत देण्यात आली नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. जर विद्युत तार किंवा खांब अंगावर पडून, तसेच इतर कुठल्याही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास, अशा कर्मचाऱ्यानांच मदत देण्यात येत असल्याचेही महावितरणतर्फे सांगण्यात येते.

इन्फो :

विजेच्या धक्क्याने ५५ प्राण्यांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून विजेचा धक्का लागून पाळीव प्राण्यांचाही मृत्यू घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ५५ पाळीव प्राण्यांचा मृत्यू

झाला असून, ज्या ठिकाणी विद्युत तारा पडून पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले आहेत, अशा प्राणी मालकानांच आर्थिक मदत देण्यात आली आहे.

इन्फो :

महावितरण कर्मचाऱ्यानांही शॉक

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देऊन विजेचे काम करून घेण्यात येते. मात्र, अनेकदा अचानक वीज पुरवठा सुरू होणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे महावितरणचे कर्मचारीच विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी झाला होता.

इन्फो :

विजेच्या धक्क्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, महावितरणतर्फे त्याचा पंचनामा केला जातो. यात महावितरणचा दोष होता की संबंधित व्यक्तीनेच विजेच्या तारांना किंवा डीपीला हात लावून मृत्युमुखी पडला.तसेच इतर कारणांचा अभ्यास केला होता. तरच मदतीस पात्र आहे की नाही, हे ठरविले जाते.

फारुख शेख, अधीक्षक अभियंता, महावितरण.

इन्फो :

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाली मदत

१) विजेच्या धक्का लागून जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, या कर्मचाऱ्याला महावितरणच्या नियमानुसार आर्थिक मदत कुटुंबीयांपर्यंत देण्यात आली आहे.

२) तसेच विजेच्या धक्क्याने गेल्या वर्षात मक्तेदाराचे बाह्यस्त्रोत तीन कामगार मृत्युमुखी पडले. त्यांनाही संबंधित मक्तेदारातर्फे महावितरणच्या नियमानुसार त्यांच्या कुटुंबीयांना

मदत देण्यात आली आहे.

३) तसेच जे नागरिक विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले. त्यामध्ये झालेल्या पंचनाम्यानुसार किती व्यक्ती पात्र ठरले व किती जणांना मदत देण्यात आली, याबाबत सध्या आकडेवारी उपलब्ध नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.