शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे श्री विठ्ठलस्वामी आणि श्री दगा महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 16:23 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी कर्नाटकचे श्री विठ्ठलस्वामी आणि श्री दगा महाराज यांच्या सांगितलेल्या आठवणी.

श्री विठ्ठलस्वामींचे आगमन कर्नाटकाहून झाले. नंदुरबारच्या द्वारकाधीशाच्या मंदिराशी त्यांचे नाव संबध्द आहे. महाराजांचे पूर्वज साधारणपणे 1510 सालच्या जवळपास समुद्रमार्गे दक्षिणेकडे प्रयाण करून उत्तर कर्नाटक इलाख्यातमील हनुमट्टा या गावी येऊन पोहोचले. स्वामींचे पूर्वज श्री शांताप्पा शानभाग अकोला तालुक्यातील अघनाशिनी नदीच्या काठावर वसलेल्या कोडकनी ग्रामी स्थायिक झाले. जमीनदार वृत्ती असूनही अत्यंत सदाचरणी, वैदिक धर्मानुयायी आणि परोपकारी असे होते. अनंत हे विठ्ठलस्वामींचे वडील होत. दुर्मती नाम संवत्सरात 1862 साली त्यांचा जन्म झाला. गृहत्याग करून स्वामींनी गोकर्ण महाबळेश्वर गाठले. तिथे तपाचरण आणि गं्रथाध्ययन केले. तीर्थयात्रा केल्या. शहादे येथे आले. स्वामींचा पत्रव्यवहार मुख्यत: कानडीतून चालायचा. विठ्ठलस्वामींचे सोनगीर येथेही येणेजाणे होते. स्वामींचे जीवन विलक्षण प्रत्ययकारी होते. भरपूर व्यासंग, उत्तम कीर्तनकला, निरुपणाची हृदयस्पर्शी शैली, शास्त्रीय गायनाची सहज संगती, मनाची पकड घेण्याची अपूर्व क्षमता असलेले निरुपण कौशल्य, कडकडीत वैराग्य, अखंड नामस्मरण आणि अन्नदानावरचा विशेष भर स्वामींच्या जीवन आणि कार्याचे विशेष सांगता येतील. भक्तीभावनेने तुडुंब भरलेल्या स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली. 1921 साली चैत्र वद्य सप्तमी रोजी स्वामींनी ईहलीला संपवली. नंदुरबारच्या द्वारकाधीशाच्या मंदिरात स्वामींची समाधी आहे. खान्देशच्या संत मंडळात आपल्या रामनाम स्मरणाच्या यज्ञकार्याने आणि अखंड सेवा भावनेने सदैव स्मरणात राहतील, असे नंदुरबार जिल्हय़ातील चौपाळे येथील श्री दगा महाराज उपाख्य ब्रrाचैतन्य महादेव महाराज यांनी रामधूनचा प्रचार करून या परिसराला एका अनोख्या जीवनदर्शनाची दिशा दाखवली आणि मौखिक धर्माची दीक्षा दिली. महाराजांचे बालपण कुकुरमुंडे येथील मठातील सेवाकार्यात गेले. संतोजी महाराजांची अपार सेवा त्यांच्या हातून घडली. आपल्या सहज विनम्र स्वभावामुळे ते जीवनाच्या अंतिम शोधयात्रेच्या निमित्ताने तिथून निघून गेले. अनेक ठिकाणी आशावाद जागवला. बालपणीच मातृपितृछत्र हरपले होते. परिस्थिती अतिशय दैन्याची, दारिद्रय़ाची होती. अज्ञान सोबतीला होते. अशा वातावरणातून वाट काढत त्यांनी आपल्या आयुष्याचा ऊध्र्वमुखी अध्याय लिहिला. नेपाळी बाबांचा त्यांना आशीर्वाद लाभला होता. संतोजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर मोठय़ा जड अंत:करणाने दगा महाराजांनी पदयात्रा करत तीर्थाटन करण्याचा संकल्प केला. देश बघितला. जनजीवन न्याहाळले. यातून साधूसंत दर्शनाचा सुयोग आला. हैद्राबाद येथील जमनादास बापूंनी चेतनाशक्ती प्रदान केली. थोर संतांच्या सत् संकल्पाने महाराज भारावले. यातून प्रभातफेरीची योजना सुरू झाली. त्यांच्या प्रेरणेने गावागावातून ब्राहय़मुहूर्ती प्रभातफे:या निघू लागल्या होत्या. गंगा, यमुना, तापी, नर्मदा यासारख्या पावन नद्यांच्या काठावर वसून त्यांनी आपल्या संकल्पानुसार तपाचरण केले. आपल्या सुनियोजित साधनेला पूर्णत्वाप्रत नेले. प्रभातफेरीच्या निमित्ताने आकाश दर्शन व्हायचे. यातून पर्यावरणाचे नेमके भान जागवता आले. पहाटेच्या समयी ऋषिवृंद गंगास्नानाला जात असल्याचे त्यांचे निवेदन होते. नाम संकीर्तन, जीर्णोध्दार, मंगल कार्यालये, धर्मशाळा, नव्या मंदिराची मुहूर्तमेढ, सत्पुरुषांच्या भागवत कथा वा रामायण प्रवचनांचे आयोजन या कामात ते गढून गेलेत. नर्मदा तटी भजन आणि भोजन यासाठी आशा येथे आश्रमाची स्थापना केली. अतिशय निरिच्छपणे कार्य करणारे असे दगा महाराज कमालीचे अपरिग्रही होते. निरहंकारी, स्वच्छ, रचनात्मक मन आणि कार्य करणारे असे दगा महाराज या परिसरात सहजच जनप्रिय झाले. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय कार्यप्रक्रियेतला त्यांचा मौन मूक वाटा केवळ पूजनीय स्वरुपाचाच होता. दगा महाराज हे संत परंपरेतले एक अद्भुत असे रत्न होते. शिक्षण नाही, भाषा ज्ञान नाही, पठण नाही, प्रवचन शैली नाही, काहीही नाही पण अंतरंगी रमलेले विलक्षण संवेदनशील मन आणि पांडुरंगध्यानी रंगलेली मुद्रा हे त्यांचे वैशिष्टय़ होते. एक हंबर आणि आर्त हृदय त्यांची ओळख होती. डोंगरे शास्त्री, पांडुरंगशास्त्री आठवले, मुरारी बापू यासारख्या संतांनी एकमुखाने दगा महाराज यांच्या कार्याची मुक्तपणे प्रशंसा केली होती. चौपाळे येथे आज रामदेव बाबांचे मंदिर आहे. रामधून आहे. प्रकाशा येथे रामरोटीची व्यवस्था आहे. हे सारे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या गैरहजेरीतही आजही सुरू आहे हे विशेष म्हणावे लागेल.