शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

ब्रह्मविद्यासंपन्न विनोबा भावेंचे बंधू श्री शिवाजीराव भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:27 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातीेल संतांची मांदियाळी’ या सदरात साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

श्री शिवाजीराव भावे बालपणी शांत व साध्या सोप्या व्यक्तिमत्त्वाच्या वळणाचे नव्हते. लाल मातीत कुस्त्यांच्या दंगलीत ते सामील होत. विनोबा आणि बाळकोबा प्रदीर्घ काळ गांधीजींच्या आश्रमात राहिले. शिवाजीरावही साबरमती आश्रमात राहिले. गांधी आश्रमात रहाणे सोपे नव्हते. गांधीजी सातत्याने नव-नवे प्रयोग करत. त्यांची साधना अवघड होती. शिवाजीरावांना कस्तुरबांच्या हाताखाली कार्य करायची संधी मिळाली. ‘कस्तुरबांच्या कसोटीवर उतरल्याशिवाय तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही’, असे गांधीजी म्हणत असत. स्वच्छता आणि व्यवस्था कस्तुरबांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्टय़े. मौन मूक सेवा या कामाचे आगळे वैशिष्टय़ होते. शिवाजीराव भांडी घासायचे काम करत. गांधीजींच्या विशेष अनुमतीने शिवाजीराव त्यांच्या कक्षात जाऊन बसत. बापूंच्या जीवनाला जाणून घ्यायचा हा एक मार्ग होता. एकदा गांधीजी व्यग्रतेने आपल्या कक्षात काही शोधत होते. ‘काय शोधताय?’ विचारल्यावर पेन्सिलचा तुकडा हरवलाय! तू पाहिलास?’ असे विचारले असता शिवाजीराव निरुत्तर झाले. ‘तू रोज इथे बसतोस ना? इथल्या सामानाला जपायची तुझी नाही का काही जबाबदारी?’ हे ऐकून शिवाजीराव घाबरले. आता दोघे मिळून पेन्सीलचा तुकडा शोधू लागले. अखेर प्रयत्नांती पेन्सीलचा तुकडा सापडला. शिवाजीरावांना हायसे वाटले. पुढे मग त्यांनी गांधी कक्षाचा निरोप घेतला. शिवाजीरावांनी वर्धा आश्रमात मुस्लिम बंधू नूर अली यांना गीता शिकवली. स्वातंत्र्य लढय़ाच्या धामधुमीत कारावास पत्करला. ग्रामसेवेचा संकल्प मनाशी धरून तीनशेहून अधिक खेडय़ांचा दौरा केला. चक्रवर्ती राजगोपालाचारींसमवेत वर्षभर भारत-भ्रमण केले. सन-1932 ते 1942 या दशकभरच्या काळात महाराष्ट्रभर गीताई प्रचारासाठी पदयात्रा केली. धुळे येथे गांधी तत्त्वज्ञान मंदिराची उभारणी केली. विपुल आणि सकस ग्रंथलेखन केले. बिहार- पंजाबात प्रवास केला. विनोबा त्यांना ‘मजूर’ मानत. बाळकोबा आणि शिवाजीराव दोघांचे जीवन परमार्थ परायण होते. विनोबा म्हणतात की, असे बंधू मला लाभले. मी याबाबत स्वत:ला धन्य समजतो. शिवाजीरावांच्या वा्मयीन अध्ययनाचा गाभा गहन आणि गुह्य आहे. त्यांच्या रचनात्मक कार्य आणि कार्यक्रमाचा अभ्यास एकाचवेळी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नीती-शास्त्र, मानववंशशास्त्र यासारख्या अनेकानेक विषयांचा आंतरविद्याशाखीय अध्ययनाचा विषयपट ठरावा. या तीन बंधुंमधील समांतर रेषा शोधणे मोठे मनोरम. यांच्यातील विविध प्रवाहांचे घाट न्याहाळणे फारच अप्रूप. शिवाजीराव यांचे जीवन आणि कार्य प्रभावशाली आहे. त्यांनी लिहिलेले ‘विनोबा जीवन दर्शन’ हे आठशेहून अधिक पृष्ठांचे विवेचक असे विनोबा चरित्र आहे. विलक्षण बुद्धिमत्ता, तरल संवेदना, स्वावलंबी जीवनशैली, अखंड ज्ञान-साधना आणि परम तत्त्वाशी जवळीक साधण्याची तितिक्षा शिवाजीरावांचे जीवनविशेष म्हणावे लागेल. ब्रह्मचर्य, गीता, गांधी या प्रस्थान त्रयीवर त्यांनी आपली जीवननौका बांधली. संस्कृतचे गाढे पंडित, सरस्वतीचे वरदपुत्र, वक्तृत्व कलेत पारंगत, संन्यासी असूनही आतिथ्यशील. भगवा न नेसताही अंतरंगी धगधगते वैराग्य जोपासणारे. सत्तास्थानांपासून ठरवून दूर-दूर राहणारे. कुणालाही गंडा न बांधता स्वतंत्र प्रज्ञेने गांधीजींच्या आश्रमीय जीवनव्यवस्थेचे उद्गाते. एकादश व्रतांचे व्रतस्थ पालनकर्ते. मनसा- काया-वचनाने सत्यनारायणाचे उपासक असे शिवाजीराव. त्यांचे जीवन परलोकार्थ होते. ईहलोकी जनता- जनार्दन त्यांनी पूजला. सेवा, त्याग, समर्पण आणि परोपकार या चतु:सूत्रीवर ते ठामपणे उभे ठाकले. ते समरसून जगले. आकाशीच्या बरसत्या धारांसारखे अनिवार, क्षमाशील धरित्रीच्या अंत:कोषासारखे भावश्रीमंत. जलप्रवाहासारखे सैरभैर. विहरत्या वायुसारखे गंधवाही. जळत्या पावकासारखे तेजोद्दीप्त. त्यांच्या जगण्याला पंचमहाभूतांची अशी सुरेख झालर लाभलेली. विनोबा मोठे, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. महाराष्ट्राला ललामभूत अशा या तीन बंधूंनी जगभर आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवला. तिघांमधला स्नेहसंवाद त्यांच्या सहोदर रूपाला अधोरेखित करणारा आहे. अखेरच्या काळातही शिवाजीरावांची दिनचर्या अक्षुण्ण होती. त्यांची प्रार्थना आणि चिंतन अखंड होते. कागदाच्या चिटो:यावर काही मजकूर लिहून ते भेटीला आलेल्यांना देत असत. विनोबांच्या समाधीवर श्रद्धासुमन वहायला जायचा त्यांच्या नियमात कधीच खळ पडला नाही. अंतिम क्षणी मित्रांच्या मदतीने त्यांनी समाधीला अभिवादन केले. अवघ्या 10 मिनिटात त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या थोरल्या बंधूंच्या भेटीसाठी ते निघून गेले. त्यांचे मरण प्रसन्न ठरले.