शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

खासदार सातव यांच्या जाण्याने पक्षाचेच नव्हे महाराष्ट्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. कार्यकर्त्याना कार्यकर्ता म्हणून नव्हेत तर मित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी निधन झाले. कार्यकर्त्याना कार्यकर्ता म्हणून नव्हेत तर मित्र म्हणून जवळ करणारे एक तरूण प्रतिभाशाली नेतृत्व हरपल्याने काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना जिल्ह्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. यासह खासदार सातव यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला आहे.

जळगावच्या आठवणी

खासदार राजीव सातव हे २०१५ साली जळगावात आले होते. त्यांनी काँग्रेस भवनात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. शिवाय नुकतीच जानेवारी महिन्यात आम्ही त्यांची मुंबईत भेट घेतली हाेती, तेव्हा जिल्ह्यात जाेमाने कामाला लागा, असे त्यांनी सांगितले होते, असे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी सांगितले. यासह त्यांनी जामनेर व पाचोरा येथेही मेळावे घेतले होते.

राजीव सातव हे अत्यंत प्रतिभाशाली नेतृत्व होते. अत्यंत कमी वयात त्यांनी पक्षाची मोठी सेवा केली. लोकांशी, जमिनीशी नाळ जोडलेला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. उज्ज्वल भविष्य असलेला नेता आपल्यातून गेला आहे. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. भविष्यातील नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायचो. - ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व हरपले आहे. कमी वयात सामाजिक आणि विकासात्मक कामांची त्यांना जाण होती. यातूनच त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला. राहुल गांधींना त्यांनी महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यक्रमात साथ दिली. त्यांचे प्रत्येक राज्यात फाॅलोअर्स आहेत. गुजरात निवडणुकीत त्यांनी निवडणूक कौशल्य पणाला लावून अगदी विजयाच्या जवळ पक्षाला नेले होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. - डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार, काँग्रेस

खासदार राजीव सातव हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माझ्याकडे युवकचे जिल्हाध्यक्षपद होते. त्यावेळी त्यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या. त्यांचा पाचोरा, जामनेर येथे मेळावा झाला होता. त्यांनी जळगावात भेट दिली होती. अगदी मित्र व भाऊ-भाऊ म्हणून ते कार्यकर्त्यांना वागणूक देत असत. त्यांच्या जाण्याने युथ काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी भरून निघणार नाही. - अविनाश भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष