शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात समांतर रस्त्यासाठी तिरडी ठेवून आंदोलन

By admin | Updated: May 26, 2017 11:15 IST

डफडेही वाजविले : समांतर रस्ते कृती समितीतर्फे महामार्गावर प्रतिकात्मक आंदोलन

ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26 - वारंवार मागणी करूनही महामार्गाच्या दोन्ही बाजूने समांतर रस्त्यांचे काम होत नसल्याच्या  निषेधार्थ गुरुवारी संध्याकाळी समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने महामार्गावर अग्रवाल हॉस्पिटल चौकात तिरडी ठेवून व डफडे वाजवून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. महामार्गावर अजून किती बळी जाणार? असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. 
महामार्गानजीक नशिराबाद नाका ते बांभोरी गिरणा पूल या 10 किलोमीटर अंतरात समांतर रस्ते विकसित नसल्यामुळे सर्वच वाहनांना महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढून निष्पापांचे बळी जाणे सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा शिवकॉलनी रेल्वे पुलावर ऐनपूर महाविद्यालयातील ग्रंथपालास भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा घटना सुरूच आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून समांतर रस्ते विकसित करण्याच्या मागणीसाठी जळगावात सर्वपक्षीय प्रतिनिधींनी एकत्र येवून समांतर रस्ते कृती समिती स्थापन केली आहे.  
कृती समितीने यासाठी पाठपुरावा करून देखील प्रशासन व शासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने गुरुवारी सायंकाळी  शहरातील अग्रवाल हॉस्पिटल चौकात  ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनस्थळी बसलेल्या कार्यकत्र्यांनी शासनाचा व प्रशासनाचा निषेध म्हणून हातात समांतर रस्त्याच्या मागणीचे फलक धरले होते. कृती समितीच्या या आंदोलनात नगरसेवक अनंत जोशी, कैलास सोनवणे, अमर जैन, गजानन मालपुरे, विनोद देशमुख, फारुख शेख, विराज कावडीया, अमित जगताप, पियूश पाटील, मितेश भदाणे, अमोल कोल्हे, नवल गोपाल, शंतनू नारखेडे, रवींद्र नेरपगारे, समीर शेख, विनोद सैनी, कल्पेश पाटील, भूषण सोनवणे, विवेक पाटील,  श्वेता कोळी, वैशाली पाटील, प्रवीण ठाकरे, प्रमोद वाणी, जे.पी. वानखेड आदी उपस्थित होते.