शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी हालचाली :उपवनसंरक्षक दिगंबर पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:06 IST

‘लोकमत’ला सदिच्छा भेटीत दिली माहिती

ठळक मुद्दे डोलारखेडा गावाच्या स्थलांतरासाठी प्रयत्न ...तर २०६ एकर जागेत गवतांचे कुरण जंगलावरील भार कमी करण्याचा प्रयत्न

जळगाव : डोलारखेडा परिसरात सद्यस्थितीत ६ वाघांचे अस्तित्व असून एका वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील मानवी वावर कमी होण्यासाठी डोलारखेडा गावाने स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. मात्र स्थलांतर करण्यासाठी हे क्षेत्र किमान ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) अथवा अभयारण्य म्हणून घोषित होणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागातर्फे प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी ‘लोकमत’ कार्यालयात दिलेल्या भेटीप्रसंगी दिली.‘लोकमत’चेनिवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत पगार यांनी वनविभागाच्या कामाची तसेच भावी योजनांची माहिती दिली.म्हणून ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रा’साठी प्रयत्न...डोलारखेडा परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याने व वाघाने हल्ला केल्याच्या घटनेनंतर लोकांनी स्वत:हूनच स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. जोपर्यंत अभयारण्य अथवा नॅशनल पार्क म्हणून हे क्षेत्र घोषित होत नाही, तोपर्यंत शासनाकडून स्थलांतरासाठी निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र हे क्षेत्र अभयारण्य घोषित झाल्यास त्याच्या अनेक जाचक अटींच्या त्रासाला परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागेल. त्याऐवजी ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) म्हणून हे क्षेत्र घोषित झाले तरी स्थलांतराची प्रक्रिया करता येईल व तुलनेत जाचक अटी कमी असतील. त्यामुळे यासाठीचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पगार यांनी दिली. सध्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रयत्नांनी हा परिसर वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र (टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित होऊ शकले. आता या जागेला सलग तारेचे कुंपण (मेटल फेन्सींग) किंवा सोलर कुंपण करण्याचा सुमारे ३३.२० लाखांचा प्रस्ताव शासनाला दिला आहे....तर २०६ एकर जागेत गवतांचे कुरणउपवनसंरक्षक पगार म्हणाले की, डोलारखेडा परिसरातील नागरिकांनी स्वत:हून स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. ते शक्य झाले तर जंगलाच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली सुमारे २०६ एकर मानवी वस्ती असलेली जमीन वनविभागाच्या ताब्यात येईल. त्या जागेत तृणभक्षी प्राण्यांसाठी गवताचे कुरण करता येईल. जेणेकरून मांसाहारी प्राण्यांना त्यांचे भक्ष्य जंगलातच उपलब्ध होईल.मृत्यू झालेली वाघीण वृद्ध... उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, डोलारखेडा परिसरात सद्यस्थितीत ४ मोठे वाघ व २ बछडे असे ६ वाघ आहेत. तर शेतात मृत्यू झालेल्या वाघीणीचे वय १६ ते १७ वर्षे होते. म्हणजेच ती वाघीण वृद्ध होती. तिच्या पायाला झालेली जखम भरली होती, त्यात ‘सेप्टीक’ झालेले नसल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले आहे. तसेच एक दात तुटला होता. मात्र वृद्धावर हल्ला याच वाघीणीने केला होता का? यासाठी जिथे हल्ला झाला होता, त्या ठिकाणावरून गोळा केलेले वाघाचे केस व मृत्यूझालेल्या वाघीणीचे केस डीएनए चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच हल्ला करणारी हीच वाघीण होती का? हे स्पष्ट होईल. तसेच या वाघीणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्या चौकशीचा अहवाल आल्यावर त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधीतावर कारवाई केली जाईल.जंगलावरील भार कमी करण्याचा प्रयत्नडोलारखेडा वनक्षेत्र हे टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून घोषीत झालेले असल्याने शासनाकडून मिळत असलेल्या निधीतून या जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यास त्याजागी कृत्रीम पाणवठे तयार करणे, गवताची कुरण करणे, वनबंधारे, सिमेंट बंधारे बांधणे, इंटरप्रिटेशन सेंटर करणे, प्रत्येक गावात युवकांच्या मदतीने वनसंरक्षणाची चळवळ राबविणे, श्यामाप्रसाद मुखर्जी जनधन योजनेंतर्गत गावांना गॅस कनेक्शन तसेच इतर सुविधा पुरविणे आदी कामे करून जंगलावरील या नागरिकांचा भार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पगार यांनी सांगितले.