शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
2
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
4
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
5
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
6
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
7
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
8
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
9
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
10
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
11
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
12
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
13
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
14
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
15
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
16
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
17
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
18
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
20
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाडळसरे धरणस्थळी शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:32 IST

पूर्वसूचना न देता पाईपची प्लेट काढण्यास विरोध : लेखी आश्वासनानंर आंदोलन स्थगित

अमळनेर, जि.जळगाव : गेल्या २० वर्षांपासून अपूर्णावस्थेतील पाडळसरे धरणात १३९ तलांकापर्यंत झालेल्या कामामुळे साठणारा दोन टीमसी जलसाठा उन्हाळ्यात कायम रहावा म्हणून पाणी उपसा करून बागायती करणाºया परवानाधारक शेतकºयांकडून गुरुवारी पाडळसरे धरणस्थळी गेट नंबर १२ वर आंदोलन छेडण्यात आले. मात्र पाणी उन्हाळ्यात कमी होणार नसल्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय गेट नंबर १२ व १८ चे पाईपांच्या प्लेट काढू देणार नाहीत या अटीवर ठाम होते. याबाबत उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकूर यांनी पाणी पातळीवर परिणाम होणार नाही व पाईप मोकळे केले तरी पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना करू, असे लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.पाडळसरे धरणाचे गेल्या २० वर्षांत एकूण २३ वक्राकार गेट बसवण्याच्या काँक्रिट कामाचे १३९ तलांकापर्यंत काम करण्यास आले आहे. त्यात गेट नंबर १२ व १८ च्या मध्ये १३४ च्या पातळीवर दोन्ही प्रस्तावात एक मीटर रुंदीचे पाईप हे भविष्यात काम करण्यास अडचण येणार नाही म्हणून पाणी काढण्यासाठी टाकण्यात आले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून दरवाजाचे कोणतेच काम करण्यास आले नसून, साईडवॉल व संरक्षण भिंतीचे कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. गेल्या मार्च महिन्यापासून धरणाचे किरकोळ बंद आहे. मात्र पावसाळा लांबल्याने धरणातील १२.९७ दशलक्ष घनमीटर जलसाठ्यातून शेकडो एकर शेतजमीन ओलिताखाली येवून बहुतांश शेतकºयांना पाणी उपसा करण्यास परवाना दिला. यामुळे ऊस, केळी, पपई ही बागायती पिके लागवड केली असून, डाळींब व पेरू ही बारमाही फळपिके लागवड केली आहेत. धरणाच्या जलाशयात उन्हाळ्यात पाण्याचा अत्यल्प साठा उपलब्ध असतो. या दोन पाईपची प्लेट काढल्यावर १३९ तलांकावर राहणारे पाणी १३४ मीटर तलांकावर आल्यास पाच मीटर पाणी पातळी कमी होईल. सर्व बागायती पिके उन्हाळ्यात धोक्यात येतील. यासाठी संबंधित विभागाकडून पिके लागवड आधी पूर्वसूचना न देता प्लेट काढण्याचा घाट ठेकेदाराच्या व्यवस्थापकाने केल्याने शेतकºयांनी पाहिले व गावातील अनेक शेतकरी धरणस्थळी पोहोचले आणि अचानक आंदोलन पुकारण्यात आले.याबाबतीत आंदोलक शेतकरी व कार्यकारी अभियंत्या रजनी देशमुख यांच्यात लेखी आश्वासन देऊन उन्हाळ्यात पाणीसाठा उपलब्ध राहण्यास अडचण येणार नाही म्हणून बोलणे झाले. मात्र शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम राहिल्याने शेवटी उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकूर यांच्या सहीचे लेखी आश्वासनाचे पत्र शाखा अभियंता स्वामी यांनी धरणस्थळी आंदोलक शेतकºयांना आणून दिले. तेव्हा आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात रणछोड पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, भूषण पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, गोपाल पाटील, भिकन पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, चिंतामण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.भविष्यात आॅक्टोबरनंतर प्रस्तावाचे काम करण्यास वरिष्ठांकडून सूचना आल्याने तात्पुरत्या स्वरूपात असलेली पाईपाची प्लेट तोडणे गरजेचे आहे. नदीपात्रात जलपातळी वाढल्यावर काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जलसाठा मर्यादित ठेवून धरण सांडव्याच्या उर्ध्व बाजूस बांध व पोहच रस्ता करून पाणीसाठा मुर्धा पातळीवर राहील. तो शेतकºयांना उपलब्ध करून देऊ.- व्ही.एस.ठाकूर, उपकार्यकारी अभियंता, पाडळसरे धरण

टॅग्स :StrikeसंपAmalnerअमळनेर