शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सासू, नणंद म्हटली, तू जिवंत राहून उपयोग नाही; आणि विवाहितेने संतापात आत्महत्या केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:18 IST

जळगाव : अंगावर सुरमा व कोडाचे डाग असल्याची माहिती लपवून ठेवत आमची फसवणूक केली. कार घेण्यासाठी तुझे आईवडील पैसे ...

जळगाव : अंगावर सुरमा व कोडाचे डाग असल्याची माहिती लपवून ठेवत आमची फसवणूक केली. कार घेण्यासाठी तुझे आईवडील पैसे देऊ शकत नाहीत. तू जिवंत राहून उपयोगाची नाही असे सततचे टोमणे असह्य झाल्याने दामिनी वैभव वैदकर (वय ३०) या विवाहितेने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हरिविठ्ठल नगरातील कोठारी नगरात शुक्रवारी सायंकाळी घडली.

दामिनीला आत्महत्येस प्रवृत्त केले व कारसाठी छळ केला म्हणून पती वैभव रामचंद्र वैदकर, सासरा रामचंद्र काशिनाथ वैदकर, सासू ज्योती व नणंद नयना वैदकर या चौघांविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नणंद नयना वगळता तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पती व सासरे दोघेही महवितरण कंपनीत नोकरीला आहेत. वैभव हा विद्युत निरीक्षक तर सासरा रामचंद्र हा वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासन विभाग) या पदावर कार्यरत आहे.

दामिनीचे वडील राजेंद्र रायभान धनगर (रा.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ एप्रिल २०१८ रोजी दामिनी व वैभव यांचा भुसावळात विवाह झाला होता. रीतीरिवाजाप्रमाणे लग्नात २० तोळे सोने व ११ लाखांचा खर्च केला होता, तर साखरपुड्यात नवरदेवाला एक तोळ्याची सोन्याची अंगठी व एक लाखाचा खर्च केला होता. दामिनीला कोड आहे असे सांगून सासू ज्योती हिने साखरपुड्यातच लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर समजूत घालून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. पती वैभव हा रत्नागिरी येथे नोकरीला असल्याने काही दिवस दामिनी सासूसोबत तेथे राहायला गेली. चार, पाच महिने सुरळीत संसार चालल्यानंतर तुझ्या वडिलांना हुंडा म्हणून मला कार दिली नाही तसेच लग्नात आमच्या नातेवाइकांना मानपान दिले नाही या कारणावरून छळ करायला सुरुवात झाली. अशातच २०२० मध्ये वैभव याची जळगावाला बदली झाली. संपूर्ण कुटुंब एकत्र राहात असताना पुन्हा तोच छळ सुरू झाला.

चहाला विलंब झाला अन् वादाला तोंड फुटले

शुक्रवारी सायंकाळी चहा ठेवण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून नणंद नयना व सासू ज्योती यांनी ‘तुझे जिवंत राहून आम्हाला काहीच उपयोग नाही’ असे म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार तिने आईला फोनवरून सांगितला. पती व सासरे सकाळीच भांडण करून निघून गेलेले होते. त्यानंतर थोड्याच वेळाने साडेपाच वाजता दामिनीची प्रकृती बिघडल्याचा वडिलांना फोन आला. त्यांनी भुसावळ येथून जळगाव गाठले असता दामिनी हिने घरात पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. वारंवार छळ व मरून जा असे बोलल्यामुळेच दामिनीने आत्महत्या केली व त्यास पती, सासू, सासरे व नणंद हे जबाबदार असल्याची तक्रार वडिलांनी दिल्यावरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. शनिवारी पती वैभव रामचंद्र वैदकर, सासरा रामचंद्र काशिनाथ वैदकर, सासू ज्योती या तिघांना अटक करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.