शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोल्हे प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गाव झाले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 18:54 IST

कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.

ठळक मुद्देकोल्हे प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक पडले ८ ते १० फुटांचे मोठे खड्डे शनिवारी रात्री गाव सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतले ग्रामस्थ

रोशन जैनलोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव : नांदोळ नदीवरील कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.पिंपळगाव हरेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर कोल्हे गाव वसले आहे. या गावातील कोल्हे मध्यम प्रकल्प अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भरला आहे. २ रोजी नांदोळ नदीला मोठा पूर आलेला होता. अशातच प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी दुपारी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यावर गावातील नागरिकांनी एकत्र येऊन तो खड्डा बुजण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला.संबंधित अधिकाºयांनी शनिवारी रात्रीच भेट दिली. त्यात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वंजारी, कार्यकारी अभियंता शिंदे, पाचोरा येथील मोरे, पाचोरा येथील तालुका निरीक्षक ए.एन.शिंदे, दिलीप धोबी, पाटकरी यांचा समावेश आहे.प्रकल्प फुटल्याच्या भीतीने कोल्हे गावातील जवळ जवळ अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांनी बाहेरगावी आपापल्या नातेवाईकांकडे प्रस्थान केले. शनिवारी रात्री निम्म्यापेक्षा अधिक गाव खाली झाल्यानंतर भीती दूर झाली आणि दुसºया दिवशी रविवारी सर्व ग्रामस्थ कोल्हे गावी परतले.गावाच्या मध्यभागी असलेल्या या नदीवरील फरशीचे डांबर व सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने दोन्ही गावातील संपर्क तुटलेला आहे. फरशीला तडादेखील गेलेला आहे.या वर्षी या प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे भगदाड यापूर्वी पाच ते सात वर्ष अगोदर पडले होते. त्यावेळी नागरिक व अधिकाºयांनी ते बुजले. मात्र आता पुन्हा धरणाच्या भिंतीवर मोठे खड्डे पडल्यामुळे संपूर्ण कोल्हे गावात भीतीचे वातावरण आहे. याकडे त्वरित संबंधित अधिकाºयांनी लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.