शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हे प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गाव झाले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 18:54 IST

कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.

ठळक मुद्देकोल्हे प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक पडले ८ ते १० फुटांचे मोठे खड्डे शनिवारी रात्री गाव सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतले ग्रामस्थ

रोशन जैनलोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव : नांदोळ नदीवरील कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.पिंपळगाव हरेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर कोल्हे गाव वसले आहे. या गावातील कोल्हे मध्यम प्रकल्प अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भरला आहे. २ रोजी नांदोळ नदीला मोठा पूर आलेला होता. अशातच प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी दुपारी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यावर गावातील नागरिकांनी एकत्र येऊन तो खड्डा बुजण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला.संबंधित अधिकाºयांनी शनिवारी रात्रीच भेट दिली. त्यात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वंजारी, कार्यकारी अभियंता शिंदे, पाचोरा येथील मोरे, पाचोरा येथील तालुका निरीक्षक ए.एन.शिंदे, दिलीप धोबी, पाटकरी यांचा समावेश आहे.प्रकल्प फुटल्याच्या भीतीने कोल्हे गावातील जवळ जवळ अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांनी बाहेरगावी आपापल्या नातेवाईकांकडे प्रस्थान केले. शनिवारी रात्री निम्म्यापेक्षा अधिक गाव खाली झाल्यानंतर भीती दूर झाली आणि दुसºया दिवशी रविवारी सर्व ग्रामस्थ कोल्हे गावी परतले.गावाच्या मध्यभागी असलेल्या या नदीवरील फरशीचे डांबर व सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने दोन्ही गावातील संपर्क तुटलेला आहे. फरशीला तडादेखील गेलेला आहे.या वर्षी या प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे भगदाड यापूर्वी पाच ते सात वर्ष अगोदर पडले होते. त्यावेळी नागरिक व अधिकाºयांनी ते बुजले. मात्र आता पुन्हा धरणाच्या भिंतीवर मोठे खड्डे पडल्यामुळे संपूर्ण कोल्हे गावात भीतीचे वातावरण आहे. याकडे त्वरित संबंधित अधिकाºयांनी लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.