शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

कोल्हे प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गाव झाले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 18:54 IST

कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.

ठळक मुद्देकोल्हे प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक पडले ८ ते १० फुटांचे मोठे खड्डे शनिवारी रात्री गाव सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी परतले ग्रामस्थ

रोशन जैनलोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव : नांदोळ नदीवरील कोल्हे मध्यम प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडले आणि हा प्रकल्प फुटल्याच्या भीतीतून निम्म्यापेक्षा अधिक गावकऱ्यांनी शनिवारी रात्री गाव सोडले.पिंपळगाव हरेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर कोल्हे गाव वसले आहे. या गावातील कोल्हे मध्यम प्रकल्प अवकाळी पावसामुळे पूर्णपणे भरला आहे. २ रोजी नांदोळ नदीला मोठा पूर आलेला होता. अशातच प्रकल्पाच्या भिंतीवर अचानक आठ ते दहा फुटांचे मोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी दुपारी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यावर गावातील नागरिकांनी एकत्र येऊन तो खड्डा बुजण्याचा प्रयत्न केला आणि तत्काळ पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला.संबंधित अधिकाºयांनी शनिवारी रात्रीच भेट दिली. त्यात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वंजारी, कार्यकारी अभियंता शिंदे, पाचोरा येथील मोरे, पाचोरा येथील तालुका निरीक्षक ए.एन.शिंदे, दिलीप धोबी, पाटकरी यांचा समावेश आहे.प्रकल्प फुटल्याच्या भीतीने कोल्हे गावातील जवळ जवळ अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांनी बाहेरगावी आपापल्या नातेवाईकांकडे प्रस्थान केले. शनिवारी रात्री निम्म्यापेक्षा अधिक गाव खाली झाल्यानंतर भीती दूर झाली आणि दुसºया दिवशी रविवारी सर्व ग्रामस्थ कोल्हे गावी परतले.गावाच्या मध्यभागी असलेल्या या नदीवरील फरशीचे डांबर व सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने दोन्ही गावातील संपर्क तुटलेला आहे. फरशीला तडादेखील गेलेला आहे.या वर्षी या प्रकल्पातून खूप मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे भगदाड यापूर्वी पाच ते सात वर्ष अगोदर पडले होते. त्यावेळी नागरिक व अधिकाºयांनी ते बुजले. मात्र आता पुन्हा धरणाच्या भिंतीवर मोठे खड्डे पडल्यामुळे संपूर्ण कोल्हे गावात भीतीचे वातावरण आहे. याकडे त्वरित संबंधित अधिकाºयांनी लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.