शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सातबारावरील ७०० हून अधिक फेरफार नोंदी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यावरील अनेक नोंदी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या अंगकाढूपणामुळे प्रलंबित आहेत. जळगाव तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यावरील अनेक नोंदी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या अंगकाढूपणामुळे प्रलंबित आहेत. जळगाव तालुक्यातील एकट्या पिंप्राळा महसूल मंडळात तब्बल ७०० हून अधिक नोंदी प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना या नोंदी किंवा फेरफार मंजूर करवून घेण्यासाठी मंडळ अधिकारी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. आव्हाणे, कानळदा, फुपनगरी, वडनगरी, खेडी, सावखेडा या गावातील शेतकरी पिंप्राळा महसूल मंडळाच्या कारभाराला कंटाळले असून, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

शेतकरी तहसील कार्यालयात जातात; पण मंडळ अधिकारी भेटत नाहीत, ते कार्यालयात नसतात. असे प्रकार सर्वत्र आहेत. शेतकरी यामुळे मेटाकुटीस आले असून, पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. मध्यंतरी जळगाव येथील तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासोबत ऑनलाइन बैठक घेतली. त्यातही प्रलंबित फेरफार, नोंदी निकाली काढण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. अधिकाधिक दिवस काम करा, अधिकाधिक वेळ देऊन नोंदी निकाली काढा, शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला नको, अशा सूचना दिल्या होत्या; परंतु त्याची दखल मंडळ अधिकाऱ्यांनी न घेता दुर्लक्ष केले. कर्जाचे बोजे, वारस नोंदी, शासनादेशानुसार नजर गहाण, तगाई या नोंदीदेखील निकाली काढल्या जात नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. अनेक गावांमधील शासकीय जमिनीच्या अधिग्रहणासंबंधीदेखील नोंदी प्रलंबित असल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तलाठ्यांनी आपले कर्तव्य केले; पण पुढे मंडळ अधिकाऱ्याकडे या नोंदी निकाली काढण्यासाठी वेळ, भाडे खर्च करावे लागत आहे. तहसील कार्यालयात दोन ते तीन तास थांबूनही काम होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. असाच प्रकार जामनेर, भुसावळ, चोपडा, यावल येथेही सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमध्ये काही भागात समन्वय नाही, असाही मुद्दा आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही जळगाव तालुक्यातील शेतकरी निवेदन सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.

कोट..

पिंप्राळा महसूल मंडळातील अनेक नोंदी रखडल्या आहेत. यामुळे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहारासह इतर कामेदेखील यामुळे थांबली आहेत. पिंप्राळा महसूल मंडळामध्येच अनेक नोंदी प्रलंबित असून, जिल्ह्यात तर ही स्थिती मोठी आहे.

-ॲड. हर्षल चौधरी, शेतकरी व पंचायत समिती सदस्य,