शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने २८ मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलेले ...

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने २८ मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलेले नाही. सरकारच्या या चालढकल धोरणामुळे मराठा समाज संतप्त झाला आहे. लवकरच मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी न्यायालयात आरक्षण टिकले नाही, याला राज्य सरकारच जबाबदार आहे. मात्र, राज्य सरकार हे आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवित आहे तर केंद्र हे राज्याकडे बोट दाखवित आहे. या दोघांच्या भांडणात आरक्षण मागे पडले असल्याची टीकाही नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी व पुढील रणनीती आखण्यासाठी अ. भा. छावा संघटनेतर्फे राज्यभर दौरे सुरू असून, शुक्रवारी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नानासाहेब जावळे पाटील हे जळगावात आले होते. यावेळी त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रपरिषदेला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. आर. व्ही. पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यापुढे जावळे पाटील यांनी सांगितले की, आताच्या सरकारने आणि मागच्या सरकारनेही मराठा समाजाचा फक्त वापर केला. आरक्षणासाठी मराठा समाजाने आतापर्यंत काढलेले सर्व मोर्चे शांततेने निघाले. मात्र, या सरकारला शांततेची भाषा समजत नाही. त्यामुळे आता पुन्हा महामोर्चा काढण्याची वेळ आली असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा बांधवांचे मेळावे घेऊन, त्यांचे मत जाणून घेत आहोत. जळगावातील मेळाव्यानंतर पुण्यात २५ ऑगस्टला मेळावा आहे. या ठिकाणी मंत्रालयावर किंवा मातोश्रीवर मोर्चा काढण्याची दिशा ठरणार असून, तीन ते चार लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचेही जावळे पाटील यांनी सांगितले.

इन्फो :

ज्यांनी विरोध केला, त्यांना निवडणुकीत पाडणार

छावा संघटना निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याबाबत, जावळे पाटील यांना विचारले असता, त्यांनी छावा संघटना निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार नसली, तरी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे, त्यांना मात्र येत्या निवडणुकांमध्ये पाडणार असल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क पूर्ण माफ करण्याची मागणीही सरकारकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

इन्फो :

तर एकाही कुटुंबाला न्याय नाही

आरक्षणासाठी मागील काळात काही तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारकडून अद्यापही या मयतांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले.