शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

‘पासपोर्ट’साठी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता महिनाभराने मिळतेय तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

जळगाव : कोरोनापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसातच नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख दिली जात होती. कागदपत्रांची ...

जळगाव : कोरोनापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसातच नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख दिली जात होती. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी नागरिकांना पासपोर्ट मिळत होता. मात्र, आता अनलॉकनंतरही पासपोर्ट प्रशासनातर्फे कोरोनाचे कारण सांगून, नागरिकांना पासपोर्टसाठी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता महिनाभराने तारीख देण्यात येत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परिणामी नागरिकांच्या हातात पासपोर्टही विलंबाने मिळत आहे.

केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे डाक विभागाच्या माध्यमातून जळगावला मे २०१८ पासून पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जळगावला कार्यालय झाल्यामुळे, येथील नागरिकांचा नाशिक व मुंबईला जाण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाचला आहे. जळगावला पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे नागरिकांना तत्काळ पासपोर्ट मिळणे सोपे झाले आहे. नागरिकांनी पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, पासपोर्ट प्रशासनातर्फे लागलीच तीन ते चार दिवसातच नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलाविण्यात येते होते. यासाठी तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या पासपोर्ट कार्यालयात सकाळपासूनच नागरिकांची कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गर्दी व्हायची. पडताळणीनंतर नागरिकांना १५ दिवसांपर्यंत घरपोच पासपोर्ट पाठविण्यात येत होते.

इन्फो :

कोरोनामुळे मिळतेय महिना भरानंतर तारीख

जळगावला पासपोर्टचे कार्यालय झाल्यामुळे नागरिकांची नाशिक, मुंबईला जाण्याची वणवण थांबली असून, पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर नागरिकांना अवघ्या दहा ते बारा दिवसात पासपोर्ट मिळत होता. या सुविधेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र, आता कोरोनामुळे पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर, नागरिकांना थेट महिनाभरानंतरची तारीख देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून व जुलै महिन्यात पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना ऑगस्टमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फो :

सध्या ३० टक्केच नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी

कोरोनापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसात कागदपत्रांच्या पडताळणीची तारीख मिळायची आणि दिवसभरात ८० ते १०० नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जायची. मात्र, आता कोरोनामुळे महिना ते दीड महिन्यानंतर नागरिकांना तारीख मिळत असून, सध्या दररोज २० ते २५ नागरिकांच्याच कागदपत्रांची पडताळणी होत आहे. परिणामी त्यामुळे नागरिकांनाही पासपोर्ट हातात मिळण्यास विलंब होत आहे. या ‘लोकमत’ प्रतिनिधीने पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी मुंबई येथील पासपोर्टच्या मुख्य कार्यालयाकडूनच नागरिकांना अर्ज केल्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंत तारीख देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या सूचनेनुसार सध्या दररोज २० ते २५ नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून, पूर्वीप्रमाणे कागदपत्रांच्या पडताळणीची तीन ते चार दिवसात मिळण्याची मागणी नागरिकांमधून पासपोर्ट कार्यालयाकडे करण्यात येत आहे.