शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वि.का.सोसायट्यांमध्ये पैशांचा ठणठणाट

By admin | Updated: April 6, 2017 00:49 IST

कर्जवसुली ठप्प : थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा; वसुली आली ३० टक्क्यांवर

आडगाव ता.चाळीसगाव : गेल्या  दीड महिन्यापासून कर्जमाफीसाठी राजकारण सुरु आहे. आज कर्जमाफी होईल, उद्या होईल अशी अपेक्षा करीत मार्च संपला व एप्रिल महिना सुरु होऊनही शेतकरी अद्यापही विकास सोसायटी, बँकांकडे फिरकलेला नाही असे चित्र दिसत आहे. दरवर्षी ७०-८० टक्के वसुली होत असे. ती यंदा केवळ २०-३० टक्के झाली आहे असे गटसचिव तसेच बँकिंग अधिकाºयांनी सांगितले. मात्र कर्जमाफी होणार नाही म्हणून वसुलीसाठी परिपत्रक काढल्याचेही या अधिकाºयांनी सांगितले.नियमित कर्ज भरणाºयांना लाभ कमी, थकबाकीदार मात्र मजेत नियमित कर्ज भरणाºयांंची संख्या अधिक व लाभ कमी तर  थकबाकीदारांची संख्या कमी  मात्र  त्यांना लाभ जादा असा आजवरचा अनुभव आहे. कारण सर्वसाधारण शेतकरी अल्पभूधारक हा नियमित कर्जपुरवठा घेतो व वेळेवर फेडतो. मोठे व सधन शेतकरी जादा कर्ज घेतात व वेळेवर कर्जफेडही करीत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार होतात मग जे थकले त्यांनाच कर्जमाफी होते व जे नियमित हप्ते भरतात त्यांना काहीही लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने कर्जमाफी केली तर ती सरसकट व्हावी अशीमागणी शेतकरीवर्ग करीत आहे. कर्ज माफ होईल  अशी अपेक्षा रोज शेतकºयांना असून ते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मार्च संपून एप्रिल महिना उजाडला  तरी सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. केंद्राने याबाबत जबाबदारी झटकली असून हात वर केले आहेत. कर्जमाफीचा निर्णय राज्यानेच घ्यावा  असे सांगण्यात आले आहे. यामुळे कर्जमाफीचा निर्णय सध्यातरी अधांतरीच आहे असे म्हणावे लागेल.कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवावीकर्जमाफी होणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरवर्षानुसार यंदाही ३१ मार्चपूर्वी शेतकºयांनी कर्ज भरावे असे परिपत्रकदेखील बँकांकडून, विकास सोसायट्यांकडून काढण्यात आले आले होते. मात्र कर्जमाफी होणार या आशेवर शेतकºयांनी कर्जाचा भरणा करण्यास अनुत्सुकता दाखवली आहे.उत्तर प्रदेश सरकारने शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. आता महाराष्ट्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून राज्य शासनाच्या भूमिकेकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याचा आठवडा संपत आला तरीही शेतकºयांची कर्ज भरण्याविषयी अनास्था दिसून येत आहे. एवढे कर्जवाटप मागील वर्षी सदर सोसायट्यामार्फत शेतकºयांना झाले आहे. गतवर्षी दुष्काळ असूनही सोसायट्यांची वसुली जवळपास ७० टक्के झाली होती. यावर्षी मात्र सरकार व विरोधी पक्षाकडून वारंवार कर्जमाफीची मागणी होत असल्याने शेतकºयांनादेखील यंदा कर्जमाफीची अपेक्षा असल्याने कर्जभरणा मार्चअखेरपावेतो केवळ २० ते ३० टक्केच झाला असे सोसायटींचे  सचिव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.