शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

वि.का.सोसायट्यांमध्ये पैशांचा ठणठणाट

By admin | Updated: April 6, 2017 00:49 IST

कर्जवसुली ठप्प : थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा; वसुली आली ३० टक्क्यांवर

आडगाव ता.चाळीसगाव : गेल्या  दीड महिन्यापासून कर्जमाफीसाठी राजकारण सुरु आहे. आज कर्जमाफी होईल, उद्या होईल अशी अपेक्षा करीत मार्च संपला व एप्रिल महिना सुरु होऊनही शेतकरी अद्यापही विकास सोसायटी, बँकांकडे फिरकलेला नाही असे चित्र दिसत आहे. दरवर्षी ७०-८० टक्के वसुली होत असे. ती यंदा केवळ २०-३० टक्के झाली आहे असे गटसचिव तसेच बँकिंग अधिकाºयांनी सांगितले. मात्र कर्जमाफी होणार नाही म्हणून वसुलीसाठी परिपत्रक काढल्याचेही या अधिकाºयांनी सांगितले.नियमित कर्ज भरणाºयांना लाभ कमी, थकबाकीदार मात्र मजेत नियमित कर्ज भरणाºयांंची संख्या अधिक व लाभ कमी तर  थकबाकीदारांची संख्या कमी  मात्र  त्यांना लाभ जादा असा आजवरचा अनुभव आहे. कारण सर्वसाधारण शेतकरी अल्पभूधारक हा नियमित कर्जपुरवठा घेतो व वेळेवर फेडतो. मोठे व सधन शेतकरी जादा कर्ज घेतात व वेळेवर कर्जफेडही करीत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार होतात मग जे थकले त्यांनाच कर्जमाफी होते व जे नियमित हप्ते भरतात त्यांना काहीही लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने कर्जमाफी केली तर ती सरसकट व्हावी अशीमागणी शेतकरीवर्ग करीत आहे. कर्ज माफ होईल  अशी अपेक्षा रोज शेतकºयांना असून ते आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मार्च संपून एप्रिल महिना उजाडला  तरी सरकारकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाही. केंद्राने याबाबत जबाबदारी झटकली असून हात वर केले आहेत. कर्जमाफीचा निर्णय राज्यानेच घ्यावा  असे सांगण्यात आले आहे. यामुळे कर्जमाफीचा निर्णय सध्यातरी अधांतरीच आहे असे म्हणावे लागेल.कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवावीकर्जमाफी होणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरवर्षानुसार यंदाही ३१ मार्चपूर्वी शेतकºयांनी कर्ज भरावे असे परिपत्रकदेखील बँकांकडून, विकास सोसायट्यांकडून काढण्यात आले आले होते. मात्र कर्जमाफी होणार या आशेवर शेतकºयांनी कर्जाचा भरणा करण्यास अनुत्सुकता दाखवली आहे.उत्तर प्रदेश सरकारने शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. आता महाराष्ट्रातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून राज्य शासनाच्या भूमिकेकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याचा आठवडा संपत आला तरीही शेतकºयांची कर्ज भरण्याविषयी अनास्था दिसून येत आहे. एवढे कर्जवाटप मागील वर्षी सदर सोसायट्यामार्फत शेतकºयांना झाले आहे. गतवर्षी दुष्काळ असूनही सोसायट्यांची वसुली जवळपास ७० टक्के झाली होती. यावर्षी मात्र सरकार व विरोधी पक्षाकडून वारंवार कर्जमाफीची मागणी होत असल्याने शेतकºयांनादेखील यंदा कर्जमाफीची अपेक्षा असल्याने कर्जभरणा मार्चअखेरपावेतो केवळ २० ते ३० टक्केच झाला असे सोसायटींचे  सचिव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.