शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

धावत्या रेल्वेतून मोबाईलची चोरी

By admin | Updated: January 18, 2017 23:30 IST

टोळी सक्रिय : सुरतच्या तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव: धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल लांबविणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून जळगावात मार्केटींगसाठी आलेल्या एका तरुणाचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी उघड झाली.दिवसभर पोलिसांकडे हेलपाटे मारल्यानंतरही याबाबत गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून ही टोळी रेल्वे स्थानक व परिसरात कार्यरत असून याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप होत             आहे.सुरत येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेले अजय बारसी (रा.सुरत) व शरद पाटील (रा.अमळनेर) हे दोन्ही तरुण मार्केटींग व प्रशिक्षण देण्यासाठी मंगळवारी सुरत-भुसावळ पॅसेंजरने जळगावात आले. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर संध्याकाळी शरद पाटील याच्याकडे अमळनेर येथे जाण्यासाठी ते संध्याकाळी 6.45 वाजता भुसावळ-सुरत पॅसेंजर गाडीत चढत असताना एका चोरटय़ाने अजयच्या खिशातील मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आला तेव्हा गाडी सुरु झालेली     होती.अनेक प्रवाशांचे लांबवले मोबाईलस्टेशन परिसरातच वास्तव्याला असलेल्या शहरातील तरुणांची एक टोळी येथे कार्यरत आहे. या टोळीने चालत्या गाडीतून अनेक प्रवाशांचे मोबाईल लांबविले आहेत. विशेष म्हणजे दरवाजाजवळ थांबलेले व पायरींवर बसलेल्या प्रवाशांचेच मोबाईल चोरुन ही टोळी पसार होते. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर येथील दिनेश बागडे या तरुणाचा मोबाईल लांबवला होता, तेव्हा चोरटय़ांचा पाठलाग करताना बागडेचा पाय कापला गेला होता तर भुसावळ रस्त्यावरही एक प्रवाशी जखमी झाली होता. लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगारच हा प्रकार करतात. असे असतानाही या तिन्ही यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात नाही.पोलिसांचा हद्दीचा वादसकाळी जळगावात यायचेच असल्याने अजय व शरद हे दोन्ही जण संध्याकाळी अमळनेर येथे निघून गेले. सकाळी जळगावात आल्यावर दोघांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे ठाणे अमलदाराने ही घटना आमच्या हद्दीत नाही असे सांगून लोहमार्ग पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.त्यामुळे या तरुणांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठले. तेथे तरुणाकडून हकीकत ऐकून घेत पक्के बील आणल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे दिवसभर फिरवाफिरव झाल्यावरही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे अजय व शरद हे दोन्ही तरुण निराश होवून माघारी परतले.