शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून मोबाईलची चोरी

By admin | Updated: January 18, 2017 23:30 IST

टोळी सक्रिय : सुरतच्या तरूणाचा मोबाईल लांबविला

जळगाव: धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल लांबविणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून जळगावात मार्केटींगसाठी आलेल्या एका तरुणाचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी उघड झाली.दिवसभर पोलिसांकडे हेलपाटे मारल्यानंतरही याबाबत गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून ही टोळी रेल्वे स्थानक व परिसरात कार्यरत असून याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप होत             आहे.सुरत येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेले अजय बारसी (रा.सुरत) व शरद पाटील (रा.अमळनेर) हे दोन्ही तरुण मार्केटींग व प्रशिक्षण देण्यासाठी मंगळवारी सुरत-भुसावळ पॅसेंजरने जळगावात आले. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर संध्याकाळी शरद पाटील याच्याकडे अमळनेर येथे जाण्यासाठी ते संध्याकाळी 6.45 वाजता भुसावळ-सुरत पॅसेंजर गाडीत चढत असताना एका चोरटय़ाने अजयच्या खिशातील मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आला तेव्हा गाडी सुरु झालेली     होती.अनेक प्रवाशांचे लांबवले मोबाईलस्टेशन परिसरातच वास्तव्याला असलेल्या शहरातील तरुणांची एक टोळी येथे कार्यरत आहे. या टोळीने चालत्या गाडीतून अनेक प्रवाशांचे मोबाईल लांबविले आहेत. विशेष म्हणजे दरवाजाजवळ थांबलेले व पायरींवर बसलेल्या प्रवाशांचेच मोबाईल चोरुन ही टोळी पसार होते. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर येथील दिनेश बागडे या तरुणाचा मोबाईल लांबवला होता, तेव्हा चोरटय़ांचा पाठलाग करताना बागडेचा पाय कापला गेला होता तर भुसावळ रस्त्यावरही एक प्रवाशी जखमी झाली होता. लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगारच हा प्रकार करतात. असे असतानाही या तिन्ही यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात नाही.पोलिसांचा हद्दीचा वादसकाळी जळगावात यायचेच असल्याने अजय व शरद हे दोन्ही जण संध्याकाळी अमळनेर येथे निघून गेले. सकाळी जळगावात आल्यावर दोघांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे ठाणे अमलदाराने ही घटना आमच्या हद्दीत नाही असे सांगून लोहमार्ग पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.त्यामुळे या तरुणांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठले. तेथे तरुणाकडून हकीकत ऐकून घेत पक्के बील आणल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे दिवसभर फिरवाफिरव झाल्यावरही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे अजय व शरद हे दोन्ही तरुण निराश होवून माघारी परतले.