शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोरोना संकटात मनरेगाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:30 IST

जळगाव : कोरोनाचे संकट ओढावले आणि अनेकांचे हातचे काम गेलेले असताना या संकटात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचा मोठा आधार ...

जळगाव : कोरोनाचे संकट ओढावले आणि अनेकांचे हातचे काम गेलेले असताना या संकटात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचा मोठा आधार जिल्ह्यातील मजुरांना मिळाला असून अनेक कामे गावातच होत असल्याने त्याचा स्थानिकांना मोठा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षाच्या तुलनेत लाॅकडाऊनच्या काळात मजुरांची संख्या वाढली असून ती जवळपास दुप्पट झाली आहे. सध्या शेतीची कामे संपल्याने यात आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला व जिल्ह्यासह राज्यात, देशात लॉकडाऊन जाहीर झाले. या लॉकडाऊनच्या काळात उद्योग, व्यापार बंद झाला, किरकोळ व्यवहार थांबले. शेतीच्या कामावरही त्याचा परिणाम झाला. अशा परिस्थितीत तर जे रोजंदारी, हातमजुरी करणारे आहेत, त्यांच्यावर तर मोठे संकट ओढावले. मात्र अशा काळात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा त्यांना मोठा आधार मिळाला.

मार्च महिन्यापासून वाढती संख्या

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची तसेच कामांचीही संख्या वाढतच गेली. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळातील मजुरांची संख्या पाहता ही सरासरी आठ हजारापर्यंत राहिली असल्याचे चित्र आहे. मजुरांची संख्या कमी-जास्त होत असताना ती सहा हजाराच्या खाली आली नाही व १० हजाराच्या पुढे गेली नाही. एरव्ही दरवर्षी मजुरांच्या संख्येची सरासरी पाहता ती चार हजार असते. मात्र लॉकडाऊन काळात ही सरासरी दुप्पटवर पोहचली आहे.

मागेल त्याला काम उपलब्ध

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सप्टेंबर २०२०पासून कोरोनाचा संसर्ग कमी-कमी होत गेल्यानंतर ऑक्टोबर २०२० व जानेवारी २०२१ या महिन्यातील तुलना पाहता जानेवारीपर्यंत ही संख्या वाढलेलीच आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सरासरी आठ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. त्यानंतर आता जानेवारी २०२१मध्ये आठ हजार १०० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या शेतीचा हंगाम संपल्याने मजूर इकडे वळत असल्याने ही संख्या वाढत असून मागेल त्याला काम उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

फळबाग लागवड, कुंपन भिंतीचा आधार

मजुरांची संख्या वाढण्यासह कामांचीही संख्या वाढली आहे. दरवर्षी घरकूल, गोठे, फळ बाग लागवड अशा विविध कामांचा मजुरांना आधार होतो. या वर्षी ही कामे होत असताना शाळेच्या कुंपन भिंतीचेही कामे झाली. यातून गावातील मजुरांना गावातच काम मिळाल्याने त्याचा मोठा आधारही त्यांना झाला. या सोबतच सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शेती बांध, शेतात फळ लागवड करण्याचे काम मिळाल्याने त्याचा २०० लाभार्थ्यांना आधार झाला. या योजनेत तब्बल ११०० रोपांची लागवड झाली. या सोबतच शाळेच्या ६०० कुंपनभिंती, १२ हजार घरकूल अशी विविध कामे होऊन लॉकडाऊनमध्ये मजुरांना मदत झाली.