शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

कोरोना संकटात मनरेगाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:30 IST

जळगाव : कोरोनाचे संकट ओढावले आणि अनेकांचे हातचे काम गेलेले असताना या संकटात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचा मोठा आधार ...

जळगाव : कोरोनाचे संकट ओढावले आणि अनेकांचे हातचे काम गेलेले असताना या संकटात मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांचा मोठा आधार जिल्ह्यातील मजुरांना मिळाला असून अनेक कामे गावातच होत असल्याने त्याचा स्थानिकांना मोठा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे दरवर्षाच्या तुलनेत लाॅकडाऊनच्या काळात मजुरांची संख्या वाढली असून ती जवळपास दुप्पट झाली आहे. सध्या शेतीची कामे संपल्याने यात आणखी भर पडत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला व जिल्ह्यासह राज्यात, देशात लॉकडाऊन जाहीर झाले. या लॉकडाऊनच्या काळात उद्योग, व्यापार बंद झाला, किरकोळ व्यवहार थांबले. शेतीच्या कामावरही त्याचा परिणाम झाला. अशा परिस्थितीत तर जे रोजंदारी, हातमजुरी करणारे आहेत, त्यांच्यावर तर मोठे संकट ओढावले. मात्र अशा काळात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा त्यांना मोठा आधार मिळाला.

मार्च महिन्यापासून वाढती संख्या

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाले आणि त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची तसेच कामांचीही संख्या वाढतच गेली. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळातील मजुरांची संख्या पाहता ही सरासरी आठ हजारापर्यंत राहिली असल्याचे चित्र आहे. मजुरांची संख्या कमी-जास्त होत असताना ती सहा हजाराच्या खाली आली नाही व १० हजाराच्या पुढे गेली नाही. एरव्ही दरवर्षी मजुरांच्या संख्येची सरासरी पाहता ती चार हजार असते. मात्र लॉकडाऊन काळात ही सरासरी दुप्पटवर पोहचली आहे.

मागेल त्याला काम उपलब्ध

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सप्टेंबर २०२०पासून कोरोनाचा संसर्ग कमी-कमी होत गेल्यानंतर ऑक्टोबर २०२० व जानेवारी २०२१ या महिन्यातील तुलना पाहता जानेवारीपर्यंत ही संख्या वाढलेलीच आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये सरासरी आठ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. त्यानंतर आता जानेवारी २०२१मध्ये आठ हजार १०० मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या शेतीचा हंगाम संपल्याने मजूर इकडे वळत असल्याने ही संख्या वाढत असून मागेल त्याला काम उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

फळबाग लागवड, कुंपन भिंतीचा आधार

मजुरांची संख्या वाढण्यासह कामांचीही संख्या वाढली आहे. दरवर्षी घरकूल, गोठे, फळ बाग लागवड अशा विविध कामांचा मजुरांना आधार होतो. या वर्षी ही कामे होत असताना शाळेच्या कुंपन भिंतीचेही कामे झाली. यातून गावातील मजुरांना गावातच काम मिळाल्याने त्याचा मोठा आधारही त्यांना झाला. या सोबतच सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शेती बांध, शेतात फळ लागवड करण्याचे काम मिळाल्याने त्याचा २०० लाभार्थ्यांना आधार झाला. या योजनेत तब्बल ११०० रोपांची लागवड झाली. या सोबतच शाळेच्या ६०० कुंपनभिंती, १२ हजार घरकूल अशी विविध कामे होऊन लॉकडाऊनमध्ये मजुरांना मदत झाली.