शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

आमदार आदर्श ग्राम योजना कागदावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2015 23:54 IST

धुळे : जिल्ह्यातील आमदारांना राज्याच्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’ बाबत फारसे गांभीर्य नसल्याची बाब समोर आली आहे.

धुळे : जिल्ह्यातील आमदारांना राज्याच्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’

बाबत फारसे गांभीर्य नसल्याची बाब समोर आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी होऊन जवळपास 4 महिन्यांचा कालावधी उलटला आह़े, परंतु आजर्पयत गावांची नावे कळविण्याची तसदी जिल्ह्यातील पाचपैकी केवळ दोघा आमदारांनी घेतली़ यावरून योजना आणि त्याची अंमलबजावणी याबाबत लोकप्रतिनिधींच्या स्तरावरही उदासीनता जाणवते. त्यामुळे गावांचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदर्श गाव साकारण्यासाठी केंद्र शासनाने 11 ऑक्टोबर 2014 रोजी सांसद आदर्श ग्राम योजना लागू केली आह़े सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातील विधान मंडळ सदस्यांनीदेखील ग्रामपंचायतींना आदर्श करण्यासाठी राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा शासनाचा विचार होता़ त्यानुसार राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय शासनाने 20 मे 2015 रोजी जाहीर केला होता.

या योजनेची अंमलबजावणी सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवरच करण्यात येणार आह़े तसेच प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातून जुलै 2019 र्पयत तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित कराव्या, असे अपेक्षित आहे.

गावे निवडीचे निकष

निवडण्यात येणा:या ग्रामपंचायतींची लोकसंख्या किमान एक हजार असावी़ आमदारांना आपल्या स्वत:चे वा पत्नीचे गाव निवडता येणार नाही़ विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर शहरी आणि ग्रामीण भागात विभागला गेला असेल तर ते मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करतील़ विधानसभा सदस्यांचा मतदारसंघ जर संपूर्णपणे शहरी असेल तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने त्याच जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड ते करू शकतील़

गावांचा सर्वागीण विकास

योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आह़े त्यामुळे गावांचा सर्वागीण विकास होऊ शकेल़ तसेच निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आमदार निधीतून घेण्यात येणा:या कामासाठी राज्य शासनाकडून जोड निधी देण्यात येणार आह़े योजनेच्या प्रभावी सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर वेब पोर्टलची निर्मिती करण्यात येईल़

माहितीचा अभाव

आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील तीन गावे दत्तक घेऊन त्यांचा कायापालट करण्याचा योजनेचा हेतू आह़े निवडलेल्या गावांची नावे 15 ऑगस्टपूर्वी जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक होत़े

ही योजना प्रभावीपणे राबविल्यास निश्चित गावांचा अधिक विकास होईल़ गावे निवडताना तेथे विकासाची खरच गरज आहे, अशी गावे निवडणे संयुक्तिक होणार आह़े

दिवी गाव अजेंडय़ावर

शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दिवी गावाचे पुनर्वसन करण्याचा मनोदय व्यक्त केला़ मूलभूत गरजा याठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आह़े गाव मॉडर्न करणार असल्याचेही ते म्हणाल़े

विकास कामाचे टप्पे

4टप्प्याटप्प्याने दरवर्षी एक याप्रमाणे तिन्ही गावांमध्ये ग्रामपंचायतीची इमारत, शाळा, अंगणवाडय़ा, स्वच्छ पाणीपुरवठा, ड्रेनेज लाइन, रस्ते, ग्रंथालय आदी विविध कामांसाठी आमदार निधीसोबतच राज्याकडून जोड निधीही देण्यात येणार आह़े

4 शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाच आमदारांकडून 15 गावांचा कायापालट होणार आह़े पण, त्यासाठी आमदारांनी तत्परता दाखविणे गरजेचे आह़े यासाठी आमदारांचा आता जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा होणे आवश्यक आह़े