शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

25 कि.मी.चा रेल्वे मार्ग मैलाचा दगड

By admin | Updated: May 27, 2017 11:21 IST

केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने या काळातील कामकाजाचा घेतलेला आढावा.

 ऑनलाईन लोकमत/ पंढरीनाथ गवळी, रमाकांत पाटील

भुसावळ/नंदुरबार,दि.28- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-जळगाव हा 25 किलोमीटर लांबीचा नवीन तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग रेल्वेच्या विकासातील व खान्देशच्या विकासात भर घालणारा मैलाचा दगड ठरणार आहे. ब्रिटिश काळानंतर प्रथमच या विभागात नवीन रेल्वे मार्ग अंथरण्यात येत आहे. या तिस:या आणि चौथ्या मार्गामुळे रेल्वेची वाहतूक जलद होऊन प्रवासी व मालवाहतूक सुकर होणार आहे. रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गामुळे येथील रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण व जळगाव येथील रेल्वेस्थानकाचाही विस्तार केला जात आहे.
भुसावळ-जळगाव या तिस:या मार्गाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. भादली-भुसावळ हा 12.65 कि. मी. लांबीचा मार्ग मार्च 2018 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे, तर भादली-जळगाव हा 11.51 कि.मी.लांबीचा रेल्वे मार्ग मार्च 2019 मध्ये पूर्ण होईल.
भुसावळ येथून तिसरा रेल्वे मार्ग जळगावकडे जाताना ‘अप’ दिशेने तरसोदर्पयत जाईल. तरसोदपासून तो पुढे डाऊन दिशेने जळगावर्पयत जाईल. जळगाव येथे हा मार्ग व्हीआयपी फलाटाच्या दोन्ही बाजूंनी  जाईल. 
सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे ेसद्यस्थितीत व्यारा ते सोनगड व सोनगड ते चिंचपाडार्पयतचे काम पूर्ण झाले आहे. धरणगाव ते बेटावदर्पयतचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. अमळनेर ते होळ या मार्गाचे कामही पूर्ण होऊन त्याचे इन्स्पेक्शन नुकतेच करण्यात आले. महिनाभरात या मार्गावरील वाहतूकही सुरू होईल. तथापि, चलठाण ते उधना, होळ ते नंदुरबार आणि पाळधी ते जळगाव या तीन टप्प्यातील जवळपास 80 किलोमीटरपेक्षा अधिक कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामांसाठी निधी मिळाल्यास कामाला गती मिळू शकेल. यापूर्वीच या प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अजून विलंब झाल्यास खर्च वाढेल. त्यामुळे या कामाला आता गती देऊन किमान मार्च 2018 र्पयत हा रेल्वेमार्ग एकदाचा पूर्ण दुहेरी करावा, अशी अपेक्षा आहे.
आशिया खंडातील दुस:या क्रमांकाचे मार्शल यार्ड असलेल्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नवीन रेल्वे मार्ग अंथरण्यासह विविध प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात अतिशय वेगाने चालना मिळाली आहे. यातीलच एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि भुसावळ-जळगाव व एकूण रेल्वेला आर्थिकदृष्टय़ा संपन्न करणारा भुसावळ-जळगाव हा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग येत्या दोन वर्षात बांधून पूर्ण तयार होणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष रूळ अंथरण्याच्या कामास येत्या सहा महिन्यांत प्रारंभ होणार आहे.