शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पांझरा काठावरील नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:14 IST

अमळनेर : अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पांझरा नदीत पुन्हा ३८ हजार ५०० क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीची ...

अमळनेर : अक्कलपाडा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पांझरा नदीत पुन्हा ३८ हजार ५०० क्यूसेस पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीची पातळी ३ ते ४ मिटरने वाढणार आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील सर्व गावातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचा इशारा दिल्यानंतर काही नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.४ आॅगस्ट रोजीच्या जोरदार पावसाने मुडी, बोदर्डे परिसरात ग्रामपंचायतीला पाण्याचा वेढा पडून रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे २०० आदिवासी कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले.त्याचप्रमाणे ५ आॅगस्ट रोजी पुन्हा ३८ हजार ५०० क्यूसेस पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळी ३ ते ४ मीटरने वाढणार आहे. परिणामी अधिक धोका निर्माण झाला आहे.प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी साहित्यासह मुडी, बोदर्डे मांडळ, कलंबू, बाम्हणे, भिलाली, तांदळी, शहापूर, भिलाली या गावांना ध्वनीक्षेपकाद्वारे गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिक्षकांना गावातच थांबण्याचे आदेशजिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांना गावातच थांबून नागरिकांना मदत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन साहित्य व पट्टीचे पोहणारे सज्ज ठेवून नदीकाठावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जे शासकीय कर्मचारी गावात थांबणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार देवरे यांनी दिला.