शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:26 IST

धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर : पाणी टंचाईचे सावट, कारवाईची मागणी

कुºहाड ता.पाचोरा : कोकडी  शिवारातील म्हसाळा धरण सध्या दुर्लक्षित आहे. या धरणाची दुर्दशा वाढतच  आहे.  यंदा १०० टक्के भरलेले  धरण हे चुकीच्या नियोजनामुळे तसेच प्रचंड पाणी चोरीमुळे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. सध्या या धरणात मृतसाठा वगळता आता केवळ १० टक्के जलसाठा असून ३५-४० वीज पंप लावून पाणी चोरी सर्रासपणे केली जात आहे. याचा परिणाम प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  कुºहाड येथे ८-१० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जर हे धरणातील वीज पंप जप्त केले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारा आहे. याकडे अधिकाºयांनी वेळीच लक्ष दिले नाही तर  नागरिकांसाठी तसेच गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.धरण भिंतीवर काटेरी झुडुपेया धरणाच्या भिंतीवर झाडांचे अतिक्रमण झाले असून याच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत. यामुळे या भिंतीला कधीही तडा पडू शकतो.  या धरणाचे काम १९७२ मध्ये झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धरणाच्या दुरुस्तीसाठी काही शेतकºयांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दोन वर्षापासून पाठपुरावाही केला आहे. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटचारी स्वच्छता स्वखर्चानेगावातील शेतकरी व धरणाचा  गेटमन रतन संपत माळी याने गतवर्षी उन्हळ्यात ४० हजार रु. खर्चून धरणापासून १ कि.मी.पावेतो पाटचारीचा गाळ जेसीबीने काढला होता,  परंतु त्याचा मोबदला या शेतकºयाला शासनाकडून मिळालेला नाही. बºयाचशा पाटचारीमधील गाळासह दुरुस्ती, पाईप लिकेज अजूनही बाकी आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची  गरज आहे. या धरणावर पाण्याची नवीन विहीर खोदून लवकरात लवकर गावाला ३-४ दिवसाआड  पाणी देऊ तसेच या विहिरीवर  स्वतंत्र डीपी बसवून देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)यंदा पावसाळयात १०० टक्के भरेलल्ल्या या धरणात सध्या केवळ  १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणावरुन ७०० एकर शेती क्षेत्र कालवा प्रवाहासाठी आहे. यंदा हे पाणी दिवाळीनंतर दोन महिन्यांनी पाटचारीने सोडले असता बरेचसे पाणी चाºयांद्वारे  गळती होऊन  वाया गेले. शेतºयांनी या धरणाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली परंतु पाणीसाठा संपल्याने ही पिके सुकू लागली आहेत. या धरणाहून कळमसरा, कोकडीतांडा, कुºहा खु।। बु।।, अंबेवडगाव, जोगे अशा गावांना पाणीपुरवठा होतो.  परंतु पाटबंधारे  अधिकाºयांचे दुर्लक्षामुळे जलसाठा हा आरक्षणापेक्षाही एक फूट खाली आहे.  या धरणाची करवसुली प्रत्येक वर्षी १,३०,०००  रु. अशी आहे. एवढा शेती पाण्याचा सारा मिळूनही या धरणाकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याने हे धरण अखेरची घटका मोजत आहे.