शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
5
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
6
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
7
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
8
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
9
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
10
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
11
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
12
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
13
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
14
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
15
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
16
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
17
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
18
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
19
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
20
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका

म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:26 IST

धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर : पाणी टंचाईचे सावट, कारवाईची मागणी

कुºहाड ता.पाचोरा : कोकडी  शिवारातील म्हसाळा धरण सध्या दुर्लक्षित आहे. या धरणाची दुर्दशा वाढतच  आहे.  यंदा १०० टक्के भरलेले  धरण हे चुकीच्या नियोजनामुळे तसेच प्रचंड पाणी चोरीमुळे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागले आहे. सध्या या धरणात मृतसाठा वगळता आता केवळ १० टक्के जलसाठा असून ३५-४० वीज पंप लावून पाणी चोरी सर्रासपणे केली जात आहे. याचा परिणाम प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  कुºहाड येथे ८-१० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जर हे धरणातील वीज पंप जप्त केले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारा आहे. याकडे अधिकाºयांनी वेळीच लक्ष दिले नाही तर  नागरिकांसाठी तसेच गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.धरण भिंतीवर काटेरी झुडुपेया धरणाच्या भिंतीवर झाडांचे अतिक्रमण झाले असून याच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत. यामुळे या भिंतीला कधीही तडा पडू शकतो.  या धरणाचे काम १९७२ मध्ये झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धरणाच्या दुरुस्तीसाठी काही शेतकºयांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दोन वर्षापासून पाठपुरावाही केला आहे. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटचारी स्वच्छता स्वखर्चानेगावातील शेतकरी व धरणाचा  गेटमन रतन संपत माळी याने गतवर्षी उन्हळ्यात ४० हजार रु. खर्चून धरणापासून १ कि.मी.पावेतो पाटचारीचा गाळ जेसीबीने काढला होता,  परंतु त्याचा मोबदला या शेतकºयाला शासनाकडून मिळालेला नाही. बºयाचशा पाटचारीमधील गाळासह दुरुस्ती, पाईप लिकेज अजूनही बाकी आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची  गरज आहे. या धरणावर पाण्याची नवीन विहीर खोदून लवकरात लवकर गावाला ३-४ दिवसाआड  पाणी देऊ तसेच या विहिरीवर  स्वतंत्र डीपी बसवून देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)यंदा पावसाळयात १०० टक्के भरेलल्ल्या या धरणात सध्या केवळ  १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणावरुन ७०० एकर शेती क्षेत्र कालवा प्रवाहासाठी आहे. यंदा हे पाणी दिवाळीनंतर दोन महिन्यांनी पाटचारीने सोडले असता बरेचसे पाणी चाºयांद्वारे  गळती होऊन  वाया गेले. शेतºयांनी या धरणाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली परंतु पाणीसाठा संपल्याने ही पिके सुकू लागली आहेत. या धरणाहून कळमसरा, कोकडीतांडा, कुºहा खु।। बु।।, अंबेवडगाव, जोगे अशा गावांना पाणीपुरवठा होतो.  परंतु पाटबंधारे  अधिकाºयांचे दुर्लक्षामुळे जलसाठा हा आरक्षणापेक्षाही एक फूट खाली आहे.  या धरणाची करवसुली प्रत्येक वर्षी १,३०,०००  रु. अशी आहे. एवढा शेती पाण्याचा सारा मिळूनही या धरणाकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याने हे धरण अखेरची घटका मोजत आहे.