शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

विजेची चोरी रोखण्यासाठी घरातील ‘मीटर’ विद्युत खांब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST

जळगाव : विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणतर्फे एरियल बंच केबल टाकण्यात येत असून, दुसरीकडे मीटरमध्येही फेरफार करून विजेची चोरी रोखण्यासाठी ...

जळगाव : विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणतर्फे एरियल बंच केबल टाकण्यात येत असून, दुसरीकडे मीटरमध्येही फेरफार करून विजेची चोरी रोखण्यासाठी महावितरणने घरातील मीटर गल्लीतीलच विद्युत खांब्यांवर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत खांब्यावर एका पेटीत प्रत्येक ग्राहकाचे मीटर बसविल्यामुळे, विजेच्या चोरीला आळा बसणार असून, जळगावात अशाप्रकारे खांब्यावर मीटर बसविण्याचा पहिलाच उपक्रम असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

महावितरणच्या पथकाने चार दिवसांपूर्वी एमआयडीसी परीसरातील रामनगर मध्ये अचानक धाड टाकून, नागरिकांच्या वीज मीटरची तपासणी केली होती. या तपासणीत नऊ जणांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले होते. तसेच दुसऱ्या दिवशींही केलेल्या तपासणीत ७ जणांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले होते. रामनगर परिसरात साधारणत: ५०० घरे असून, यातील बहुतांश ग्राहकांकडून अशा प्रकारे मीटरमध्ये चुंबकीय पद्धतीचा वापर करून, मीटरचा वेग कमी करून विजेची चोरी करत असल्याचे महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे ज्या ग्राहकांचे दर महिन्याला युनिट १५० ते २०० फिरायचे, त्या ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्यामुळे त्यांना ४० ते ५० युनिटपर्यंत बिल यायचे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने रामनगर मधील सर्व ग्राहकांचे मीटर गल्लीतील विद्युत खांब्यांवर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

खान्देशात पहिलाच प्रयोग जळगावात

महावितरणतर्फे वीजचोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, यामध्ये घरातील वीज मीटर विद्युत खांब्यांवर बसविण्याचा उपक्रम खान्देशात प्रथमच जळगाव शहरात राबविण्यात येत आहे. विद्युत खांब्यांवर ३ फूट लांबीच्या पेटीत १२ मीटर बसवून, या पेटीची देखभालीची जबाबदारी संबंधित भागातील शाखा अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. पेटीतील प्रत्येक मीटरवर संबंधित ग्राहकाचा मीटर क्रमांक असून, त्या क्रमाकांच्या आधारे दर महिन्याला रीडिंग घेऊन, ग्राहकांना वीजबिल देण्यात येणार आहे. या पेटीला बाहेरून ‘लॉक’ करण्याची व्यवस्था असून, याची किल्ली त्या-त्या भागातील शाखा अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, ऊन, वारा व पावसापासून या पेटीला कुठलाही धोका नसून, मीटर सुरक्षित राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

सर्व खर्च महावितरणचा :

विद्युत खांबावर एका पेटीत हे मीटर बसविण्यात येत असून, एका पेटीसाठी महावितरणला साधारणत: पाच हजार रुपये खर्च येत आहे. विद्युत खांब्यांवर पेटी बसविण्यासाठी शहरातील एका खासगी मक्तेदाराला ठेका देण्यात आला आहे. ग्राहकांचे घरातील मीटर काढून, ते पेटीमध्ये बसविण्यापर्यंतचा सर्व खर्च महावितरणतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, रामनगरमध्ये आतापर्यंत १०० ग्राहकांचे वीजमीटर खांब्यांवर बसविण्यात आले असून, उर्वरित ग्राहकांचे मीटरही लवकरच खांब्यांवर बसविण्यात येणार आहेत.

इन्फो :

विद्युत खांबांवर मीटर बसविण्याचे फायदे

- ग्राहकांना मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही.

- विद्युत पुरवठ्याची वायर थेट खांब्यावर असल्यामुळे विजेची चोरी करता येणार नाही.

- ज्या ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे, त्या ग्राहकांचा वीजपुरवठा थेट विद्युत खांब्यावरूनच खंडित करण्यात येणार.

-दर महिन्याला रीडिंग घेण्यासाठी नागरिकांच्या घरी जाण्याची गरज राहणार नसून, विद्युत खांब्यावर एकाच ठिकाणी सर्व ग्राहकांचे रीडिंग घेता येईल.

-मुख्य म्हणजे या सुविधेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा घरोघरी जाऊन रीडिंग घेण्याचा वेळही वाचणार आहे.

इन्फो :

रामनगरमध्ये अनेक ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून, विजेची चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीटरमध्ये फेरफार केल्यामुळे युनिट फिरण्याची गती कमी होऊन, ग्राहकांना कमी वीजबिल यायचे. त्यामुळे या चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी या परिसरात सर्वच घरातील वीजमीटर गल्लीतील विद्युत खांब्यांवर बसविण्यात येत आहेत. यामुळे ग्राहकांना आता मीटरमध्ये फेरफार करणे शक्य नाही.

सुरेश पाचंगे, सहायक अभियंता, रामनगर, महावितरण.