शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

बुध बाजार उठवला; मात्र निवृत्तिनगरात थाटला गेला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

सुभाष चौक, बळीराम पेठ भागात ४५ हॉकर्सवर कारवाई : पिंप्राळा बाजारही उठवला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेने ...

सुभाष चौक, बळीराम पेठ भागात ४५ हॉकर्सवर कारवाई : पिंप्राळा बाजारही उठवला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेने निश्चित करून दिलेल्या नऊ जागांवरच व्यवसाय करण्यास मनपा प्रशासनाने मंजुरी दिली असून, शहरातील मुख्य रस्त्यांलगत दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी अक्सानगर भागातील बुध बाजार, तर पिंप्राळा बाजार मनपाच्या पथकाकडून उठविण्यात आला आहे. मात्र, निवृत्तिनगरात गेल्या काही आठवड्यांप्रमाणे बुधवारीदेखील मोठा बाजार भरला. यामुळे एकीकडे मनपाकडून कारवाई होत असताना, दुसरीकडे हॉकर्स मात्र शहरातील नवनवीन जागांचा शोध घेऊन नवीन बाजार भरविताना दिसून येत आहेत.

मनपा प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पुढील सहा महिने हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. मात्र, हॉकर्सदेखील मनपाच्या पथकाला एकप्रकारे आव्हान देत मिळेल त्याठिकाणी जागा करून आपला व्यवसाय सुरू करत आहेत. बुधवारीदेखील शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, फुले मार्केट परिसरात अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. यामुळे बाजारपेठेत पुन्हा गर्दी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बाजारात येऊन हॉकर्सवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.

४५ हॉकर्सच्या हातगाड्या जप्त

मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बुधवारी सुभाष चौक, फुले मार्केट भागात ४५ हॉकर्सवर कारवाई करून हातगाड्या जप्त केल्या आहेत. तसेच अनेक हॉकर्सचा मालदेखील मनपाने ताब्यात घेतला आहे. या कारवाईदरम्यान अनेक विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे या ठिकाणचे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. शनिपेठ व शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून, हा वाद शांत केला.

बुध बाजारही बसूच दिला नाही

शहरातील अक्सा नगरात भरणारा बाजारदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने बसू दिला नाही. सकाळी ७ वाजेपासून एसआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मनपा कर्मचारी ठाण मांडून होते. याठिकाणी अनेक विक्रेते आले मात्र एकाही विक्रेत्याला याठिकाणी व्यवसाय करू देण्यात आला नाही. दरम्यान, निवृत्तिनगर भागाकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी या भागात मोठा बाजार भरला. याठिकाणी ३०० हून अधिक विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. दुपारी मात्र अनेक विक्रेत्यांनी मनपाने निश्चित करून दिलेल्या मानराज पार्कच्या जागेवर दुकाने थाटली, तर पिंप्राळा बाजाराच्या ठिकाणीही मनपाने तगडा बंदोबस्त केल्यामुळे याठिकाणीही बाजार भरू देण्यात आला नाही.