शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जळगावातील पारा १० अंशापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या वातावरण बदलाचे परिणाम ऋतुंवरदेखील होत जात आहे. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या वातावरण बदलाचे परिणाम ऋतुंवरदेखील होत जात आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या सरासरीत मोठी वाढ झाली आहे. तर हिवाळ्यातील ऋतूमान देखील बदललेले आहे. नेहमी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात गारठवणारी थंडी यंदा या महिन्यात गायबच होती. मात्र, या तीन महिन्यात गायब झालेली थंडी फेब्रुवारी महिन्यात आपला कहर दाखविताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तापमानात मोठी घट झाली असून, आठवडाभरापासून किमान तापमान १२ अंशाच्या खाली आहे. यामुळे जळगावकरांना थंडीने चांगलेच गारठवले आहे. सोमवारी जळगाव शहराचा पारा १० अंशापर्यंत खाली आला होता.

नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात अरबी व बंगालच्या उपसागराकडून सातत्याने बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत होते. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांना पूर्णपणे अडकाव झाला. यामुळे यंदा थंडीचा कहर कमी झाला होता. मात्र, हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टी त्यातच महाराष्ट्रात झालेले कोरडे हवामान यामुळे उत्तरेकडील थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. यामुळे गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कहर वाढला आहे. जिल्ह्यात साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात थंडी परतीच्या मार्गावर असते. मात्र, यंदा फेब्रुवारीतच तापमानाचा पारा खाली जात आहे. तसेच आगामी काही दिवस किमान तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.