शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

मानसिक सुदृढता जास्त महत्त्वाची…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST

मुळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजाराची तीव्रता ही फक्त मानसिक आरोग्याच्या वाईट स्थितीमुळे काही पटीने जास्त तीव्र होऊ शकते. ...

मुळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजाराची तीव्रता ही फक्त मानसिक आरोग्याच्या वाईट स्थितीमुळे काही पटीने जास्त तीव्र होऊ शकते. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे सर्वांनीच प्राधान्याने व हेतूपुरस्सर लक्ष दिल्यास कोरोना या शारीरिक आजाराशी आपण प्रभावीपणे यशस्वी लढा देऊ शकतो.

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या उक्तीप्रमाणे फक्त कोरोना झालाय, एवढे समजताच अनेक नकारात्मक विचार, भीती, अस्वस्थता, काळजी या सर्वांनी मनात थैमान घातल्याने चिंता (अँक्झायटी) आजाराची तीव्रता अनेक पटीने वाढत आहे. ही भीती सर्वप्रथम काढून टाकली पाहिजे.

वैयक्तिक पातळीवरदेखील सर्वजण मास्क, शिल्ड, स्वच्छता, योग्य आहार, आदींची काळजी घेत आहेतच, परंतु त्यासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी काही उपाय करणेदेखील आवश्यक आहे. जसे की घरीच व्यायाम, प्राणायाम, ध्यान, शरीर शिथिलीकरण, योगनिद्रा, कुटुंबीयांशी सुसंवाद, घरातच विविध खेळ, पुरेशी शांत झोप, आळस झटकून दिवसभराचे योग्य शेड्यूल ठरविणे, गाणी, पेंटिंग, आदी छंद जोपासणे वगैरे. ही जागतिक महामारीची लाट ओसरेपर्यंत सर्वांना त्रास होणारच, हे लक्षात घेणे आवश्यक असून हा आजार झालाच तर या आजाराचे स्वरूप समजावून घेऊन निर्धाराने व सकारात्मक विचाराने त्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आजारी व्यक्तीला इतरांनी हसत-खेळवत व तणावमुक्त ठेवावे लागेल. मनातील विवेकी विचार हीच सर्वांत मोठी शक्ती असल्याने त्याला ताब्यात ठेवत हे सर्व उपाय करावे लागतील. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावे लागेल. चला तर मग आपण सर्वजण मिळून कोरोना या महामारीला अतिशय निर्धाराने सामोरे जाऊन सकारात्मक व विवेकी विचारांनी आपल्या सर्वांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवूया व या संकटांवर यशस्वी मात करूया.

- डॉ. हर्षदा दिलीप पाटील,

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र,

वाघळी, ता. चाळीसगाव.