शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मेहरूण तलाव बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे मेहरूण तलावाची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. तलावात सोडण्यात येणारे ...

गेल्या काही वर्षांपासून मनपा प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे मेहरूण तलावाची जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. तलावात सोडण्यात येणारे सांडपाण्याचे मिश्रण, अनियमित स्वच्छतेमुळे तलाव परिसरात जाणारा कचरा, तलावाचे आटणारे जलस्रोत, पाळीव प्राण्यांचा वापर, तलावात थेट वाहने धुणे आदी समस्यांमुळे तलावाचे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या समस्या पहिल्यांदा सोडविल्या पाहिजेत.

विजय वाणी

मी व आमचा मित्र परिवार गेल्या २० वर्षांपासून नियमित पहाटे मेहरूण चौपाटीवर फिरायला जातो. जळगावकरांना नैसर्गिक वातावरणात फिरण्यासाठी ते एकमेव ठिकाण आहे. मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथे तयार करण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कमधील निम्मी झाडे वाळून गेली आहेत. तसेच या ठिकाणी आहे त्या झाडांची तोडणी होत आहे. मनपाचे फक्त सुशोभीकरणाकडे लक्ष आहे, समस्यांकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

किशोर भुतडा

मेहरूण तलाव परिसरातच माझे घर असल्याने, नेहमी तलावाच्या चौपाटीवर सकाळी फिरायला जात असते. तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन तलावातील जलचर प्राणी व वनस्पती नष्ट होत आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या मनपाने त्वरित मार्गी लावावी. तलावाचे सुशोभीकरण करण्याआधी सांडपाण्याचा प्रश्न सोडविल्यावरच तलावाचे अस्तित्व टिकून राहील.

डॉ. सुनीती बेंद्रे

तलाव परिसरात नेहमी टवाळखोर मुलांचा वावर राहत असल्यामुळे फिरण्यासाठी आलेल्या महिलांना भीती वाटते, तसेच अनेक ठिकाणचे पथदिवेही बंद आहेत. या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करून टवाळखोरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षक नियुक्त केला तर, या ठिकाणी होणारी वृक्षतोड थांबेल.

देवकी नारखेडे

सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होत असल्याबाबत, याची कल्पना मनपा प्रशासनाला व शहरातील लोकप्रतिनिधींनाही आहे. मात्र, त्यांनी इतक्या वर्षांत कधीही लक्ष दिले नाही. तलाव परिसरात गेल्या दोन ते तीन वर्षांत करोडो रुपये खर्च करून विविध प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, इतकाच पैसा जर सांडपाण्याच्या विल्हेवाटीसाठी केला असता, तर तलावाचे पाणी दूषित झाले नसते.

विजय नारखेडे