शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांबांच्या कामाबाबत उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:16 IST

पालकमंत्री घेणार आढावा : मनपा नाही तर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे थांबले काम ? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील ...

पालकमंत्री घेणार आढावा : मनपा नाही तर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे थांबले काम ?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असून, पुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेले विद्युतखांब स्थलांतर करण्याबाबत शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनेक महिन्यांपासून हे काम रखडले असून, या बैठकीत विद्युतखांब स्थलांतर करण्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.

फेब्रुवारी २०१९मध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम सप्टेंबर २०२०पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या कामावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच या पुलाच्या बांधकामाला मुख्य अडथळा महावितरणचे विद्युत खांब ठरत आहेत. विद्युत खांब स्थलांतर होत नसल्याने या पुलाचे काम रखडत जात आहे. हे काम करण्याची जबाबदारी महावितरणची होती. मात्र, निधी नसल्याचे कारण देत महावितरण कंपनीने या कामास चालढकल केली. तसेच मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळेदेखील या कामाला मोठा फटका बसला आहे. ‘लोकमत’ने याबाबत बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विद्युत खांब स्थलांतर करण्याबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीचे नियोजन आता करण्यात आले आहे. त्रिसदस्यीय समितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व आमदार सुरेश भोळे यांचा समावेश आहे. ही बैठक गुरुवारी होणार होती. मात्र, पालकमंत्री मुंबईत असल्यामुळे आता ही बैठक शुक्रवारी होणार आहे.

अंदाजपत्रक देण्यास महावितरणने केला उशीर

शिवाजीनगर उड्डाणपुलाला अडथळा ठरणारे विद्युत खांब स्थलांतर करण्याची जबाबदारी महावितरणकडे होती. मात्र, महावितरण कंपनीने तब्बल वर्षभर या कामाबाबत उदासीनता दाखवली. मनपा प्रशासनाने शहराच्या विकासकामासाठी प्राप्त झालेल्या निधीतून हे काम मार्गी लावण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात ठराव करून घेतला. ठराव केल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाने महावितरण कंपनीला पत्र पाठवून, या कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, महावितरण कंपनीने तब्बल दोन महिने मनपाकडे अंदाजपत्रक पाठवलेच नसल्याने या कामाला उशीर झाल्याचा दावा आता मनपा प्रशासनाने केला आहे. याबाबत झालेल्या पत्रव्यवहाराची माहितीदेखील मनपा प्रशासनाकडून ‘लोकमत’कडे देण्यात आली आहे. यावरून महावितरण कंपनीच्या उदासीनतेमुळे हे काम रखडत असल्याचेही आता समोर येत आहे.

दोन वेगवेगळी अंदाजपत्रके सादर

महावितरण कंपनीने मनपा प्रशासनाला दोन अंदाजपत्रके सादर केली असून, शिवाजीनगर भागातील विद्युत खांब हटवण्यासाठी ६७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, तर दुसऱ्या अंदाजपत्रकानुसार जिल्हा परिषद ते टावर चौकपर्यंतचे विद्युत खांब हटवण्यासाठी ८२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने ३० एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर तीन सदस्यीय समितीची बैठकदेखील होणे अपेक्षित होते. मात्र, महिनाभराच्या उशिराने आता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतरच पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.