शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

जळगावात जिल्हाधिका-यांनी घेतलेली बैठक निष्फळ, तलाठी संपावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:17 IST

बोलणी फिस्कटली

ठळक मुद्देआरोपींना अटकेसाठी मागितली वेळराज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनासंदर्भात मंगळवारी तलाठी संघाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची बैठक झाली. यामध्ये आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन मिळाल्याने बोलणी फिस्कटून तलाठी बांधव बंदवर ठाम आहे. दरम्यान, आरोपींना लवकर अटक झाली नाही तर राज्यभर बंद पुकारण्याचा इशारा तलाठी संघाने दिला आहे.   अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 13 दिवसांनंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे.     या पाश्र्वभूमीवर मंगळवार, 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके,  पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची तलाठी संघासोबत बैठक झाली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले, मात्र ठोस कारवाई नसल्याने तलाठी संघाचे पदाधिकारी आरोपींना तत्काळ अटकेच्या मागणीवर ठाम असून बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, संघटक व्ही.आर. मानकुंभरे, सरचिटणीस जे.डी. बंगाळे, खजिनदार सचिन जगताप उपस्थित होते. 

राज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणादोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे.  आजही ठोक कारवाई होत नसल्याने आता राज्यभरात लेखणी बंद करण्याची लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे जे.डी. बंगाळे यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या पदाधिका:यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचीदेखील भेट घेतली होती. प्रशासकीय कामेही रेंगाळलेतलाठींच्या लेखणी बंदमुळे प्रशासकीय कामेही रेंगाळली असल्याचे अधिका:यांमार्फतच सांगितले जात आहे. सातबारा संगणीकरणाचे काम 10 टक्क्याने खाली आले असून वसुलीही ठप्प झाली आहे. 

तलाठी लेखणी बंद संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात येऊन बंद मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पोलीस अधीक्षकांसह माङयामार्फत कार्यकवाही सुरू आहे. - किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.