शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

जळगावात जिल्हाधिका-यांनी घेतलेली बैठक निष्फळ, तलाठी संपावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:17 IST

बोलणी फिस्कटली

ठळक मुद्देआरोपींना अटकेसाठी मागितली वेळराज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 - अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनासंदर्भात मंगळवारी तलाठी संघाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची बैठक झाली. यामध्ये आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन मिळाल्याने बोलणी फिस्कटून तलाठी बांधव बंदवर ठाम आहे. दरम्यान, आरोपींना लवकर अटक झाली नाही तर राज्यभर बंद पुकारण्याचा इशारा तलाठी संघाने दिला आहे.   अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून  लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 13 दिवसांनंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे.     या पाश्र्वभूमीवर मंगळवार, 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके,  पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची तलाठी संघासोबत बैठक झाली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले, मात्र ठोस कारवाई नसल्याने तलाठी संघाचे पदाधिकारी आरोपींना तत्काळ अटकेच्या मागणीवर ठाम असून बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, संघटक व्ही.आर. मानकुंभरे, सरचिटणीस जे.डी. बंगाळे, खजिनदार सचिन जगताप उपस्थित होते. 

राज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणादोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे.  आजही ठोक कारवाई होत नसल्याने आता राज्यभरात लेखणी बंद करण्याची लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे जे.डी. बंगाळे यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या पदाधिका:यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचीदेखील भेट घेतली होती. प्रशासकीय कामेही रेंगाळलेतलाठींच्या लेखणी बंदमुळे प्रशासकीय कामेही रेंगाळली असल्याचे अधिका:यांमार्फतच सांगितले जात आहे. सातबारा संगणीकरणाचे काम 10 टक्क्याने खाली आले असून वसुलीही ठप्प झाली आहे. 

तलाठी लेखणी बंद संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात येऊन बंद मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पोलीस अधीक्षकांसह माङयामार्फत कार्यकवाही सुरू आहे. - किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.