शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

स्मशानभूमीतील ओट्यांची संख्या वाढवण्याचे महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू होत आहेत. यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने, अनेकांना खाली अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात असल्याने, या स्मशानभूमीत सात अतिरिक्त ओटे वाढवण्याचा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे. तसेच काही ठिकाणी हे लोकसहभागातून तयार करण्यात येतील, अशीही माहिती महापौरांनी दिली आहे.

शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीत एकूण आठ ओटे असून, मृतदेहांची संख्या वाढल्याने हे ओटे आता कमी पडत आहेत. अनेकांना मृतदेह आणून ओट्यांसाठी तासभर वाट पहावी लागत आहे. तर अनेकांना ओट्यांच्या खालीच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शहरातील परिस्थिती गंभीर होत जात असल्याने आता नेरी नाका स्मशानभूमीत सात अतिरिक्त ओटे तयार करण्यात येणार आहेत. महापौर जयश्री महाजन यांनी याबाबत मनपा प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच काही ओट्यांसाठी काही सामाजिक संस्थादेखील तयार आहेत. यामुळे येत्या चार दिवसात नेरी नाका स्मशानभूमीत अतिरिक्त ओटे तयार करण्यात येणार आहेत. याबाबत सोमवारी महापौर जयश्री महाजन नेरी नाका स्मशानभूमीची पाहणी करणार आहेत. तसेच मेहरूण परिसरातील स्मशानभूमीवर देखील काही ओट्याची संख्या वाढविण्यात येणार असल्याचीही माहिती महापौरांनी दिली.

परिस्थिती झाली गंभीर

शहरातील परिस्थिती आता गंभीर होत जात असून, नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर शहरातील शिवाजीनगर व मेहरूण परिसराचे स्मशानभूमीवरदेखील दररोज मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. शहरात दिवसाला ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे होत आहे. याआधी शहरात दिवसाला दहा ते बारा इतक्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात ही संख्या ५० पर्यंत पोहोचल्याने शहरातील परिस्थिती आता गंभीर स्वरूप घेताना दिसून येत आहेत. प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी दाखवली जात असली तरी शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणारे मृतदेहांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनासमोर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.