शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

स्मशानभूमीतील ओट्यांची संख्या वाढवण्याचे महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू होत आहेत. यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने, अनेकांना खाली अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात असल्याने, या स्मशानभूमीत सात अतिरिक्त ओटे वाढवण्याचा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे. तसेच काही ठिकाणी हे लोकसहभागातून तयार करण्यात येतील, अशीही माहिती महापौरांनी दिली आहे.

शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीत एकूण आठ ओटे असून, मृतदेहांची संख्या वाढल्याने हे ओटे आता कमी पडत आहेत. अनेकांना मृतदेह आणून ओट्यांसाठी तासभर वाट पहावी लागत आहे. तर अनेकांना ओट्यांच्या खालीच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. शहरातील परिस्थिती गंभीर होत जात असल्याने आता नेरी नाका स्मशानभूमीत सात अतिरिक्त ओटे तयार करण्यात येणार आहेत. महापौर जयश्री महाजन यांनी याबाबत मनपा प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच काही ओट्यांसाठी काही सामाजिक संस्थादेखील तयार आहेत. यामुळे येत्या चार दिवसात नेरी नाका स्मशानभूमीत अतिरिक्त ओटे तयार करण्यात येणार आहेत. याबाबत सोमवारी महापौर जयश्री महाजन नेरी नाका स्मशानभूमीची पाहणी करणार आहेत. तसेच मेहरूण परिसरातील स्मशानभूमीवर देखील काही ओट्याची संख्या वाढविण्यात येणार असल्याचीही माहिती महापौरांनी दिली.

परिस्थिती झाली गंभीर

शहरातील परिस्थिती आता गंभीर होत जात असून, नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला ३५ हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. तर शहरातील शिवाजीनगर व मेहरूण परिसराचे स्मशानभूमीवरदेखील दररोज मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. शहरात दिवसाला ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे होत आहे. याआधी शहरात दिवसाला दहा ते बारा इतक्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र गेल्या पंधरा दिवसात ही संख्या ५० पर्यंत पोहोचल्याने शहरातील परिस्थिती आता गंभीर स्वरूप घेताना दिसून येत आहेत. प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी दाखवली जात असली तरी शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणारे मृतदेहांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनासमोर चिंतेचा विषय निर्माण झाला आहे.