शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भोरगाव लेवा पंचायततर्फे पाच उपवरांचे सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 16:57 IST

दृष्टीहीन दलित जोडप्यानेही केले लग्न

भुसावळ : लेवा पंचायत शाखा भुसावळतर्फे इतिहासात नोंद होईल असा आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम राबवत पाच जोडप्यांनी खर्चिक लग्न कार्याला फाटा देत सामूहिक विवाहात सात जन्माच्या रेशीम गाठी बांधल्या व या सामूहिक विवाहात दृष्टिहीन बौद्ध जोडप्यांचे लग्न कार्य पार पडले हे विशेष. सामुदायिक सोहळा संतोषीमाता मंगल कार्यालयात मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.आधुनिक युगात समाजाला, नावाला शोभेल अशा पद्धतीने खर्चिक विवाह सोहळे पार पडतात. यात वेळ व पैशा मोठ्या प्रमाणात खर्च होतो, मात्र इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने भुसावळ लेवा पंचायत शाखेतर्फे जोडप्यांचे सामूहिक विवाह पार पडले. त्यात एक दलित समाजाच्या दृष्टिहीन जोडप्याचे बौद्ध रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. लेवा पाटीदार समाजाचा सामूहिक विवाह बौद्ध समाजाचा लग्न सोहळा हा प्रथमच झाल्याचे जाणकारांचे मत आहे.बौद्ध समाजाचे दृष्टिहीन जोडप्यांनी बांधल्या सात जन्माच्या रेशीमगाठीनाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथील वर मंगेश अशोक धीवरे व वधू दीपाली उबाले पिंपरी या दृष्टिहीन जोडप्यांना लेवा समाजातील मान्यवरांनी आशीर्वाद देऊन बौद्ध रितीरिवाजाप्रमाणे लग्नकार्य केले. या क्षणाची नोंद इतिहासात सोनेरी अक्षरात कोरली गेली.याशिवाय लोकेश किशोर कोल्हे (रोझोदा) व राजेश्वरी बळीराम चौधरी (पाडळसा), कौतिक सुभाष फेगडे (रोझोदा) विनिता विनोद चौधरी (खिरोदा), अक्षय रवींद्र फेगडे (दीपनगर) विशाखा विठ्ठल चौधरी( भुसावळ), हर्षल प्रमुख चौधरी (खिरोदा ) विजया विजय भोसले या जोडप्यांचेही सामूहिक विवाहात लग्न कार्य पार पडले.तीन विवाह नाकारलेया आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह होत असताना याठिकाणी तीन नव वधू वर यांनीही विवाहाची तयारी दर्शवली. मात्र आयोजकांनी फक्त पाच विवाहाचीच परवानगी असल्यामुळे आता हे शक्य नसल्याचे सांगितले. पुढील सामूहिक विवाहात आपले विवाह पार पाडू, असे आश्वासन दिले.यांनी घेतला पुढाकारभोरगाव पंचायत भुसावळ शाखा शाखेचे समिती अध्यक्ष आरती चौधरी, मंगला पाटील, आरती सारंग चौधरी, सुहास चौधरी, डॉ.बाळू पाटील, शरद फेगडे, माजी आमदार नीळकंठ फालक, डिगंबर महाजन, ॲड.प्रकाश पाटील, भोरगाव पंचायत पाडळसेचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, अजय भोळे, रघुनाथ चौधरी, महेश फालक, लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश संघटक रुपेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष श्याम भारंबे, शहराध्यक्ष देवा वाणी यांनी यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडले.नवदांपत्यांना दिल्या संसारोपयोगी वस्तू भेटया सामूहिक विवाह कार्यक्रमात पार पडलेल्या लग्न सोहळ्यातील नवदांपत्यांना आयोजकांतर्फे १५ हजारांचे संसारोपयोगी भेटवस्तू देण्यात आले यात गॅसच्या दोन शेगडीसह कुकर, पाण्याची टाकी, मिक्सर, पंखा व इतर साहित्य देण्यात आले.लेवा समाजातर्फे आचार्याचे काम पंडित राहुल जोशी यांनी, तर बौद्ध समाजाचे लग्नकार्यासाठी बौद्धाचार्य सुनील केदारे यांनी लग्न कार्य पार पाडले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ