शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST

आनंद सुरवाडे वाढत्या तक्रारी : रोज स्वच्छ मास्क वापरा, वारंवार घाम पुसण्याचा तज्ज्ञांचा सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

आनंद सुरवाडे

वाढत्या तक्रारी : रोज स्वच्छ मास्क वापरा, वारंवार घाम पुसण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात संरक्षण म्हणून नाका - तोंडावर मास्क लावणे अत्यावश्यक असून ते आता सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, या मास्कच्या वापरामुळे चेहऱ्याला घाम येणे, खाज सुटणे असे ॲलर्जीचे प्रकारही वाढत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून समोर यायला लागल्या आहेत. यासाठी नियमित स्वच्छ धुतलेलाच मास्क वापरावा व काही अवधी तो मास्क काढून चेहरा स्वच्छ करावा, असा सल्ला त्वचा रोग तज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून सर्वच नागरिक कोरोनाचा सामान करीत आहेत. या काळात संरक्षण म्हणून मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनापासून संरक्षण हवे असल्यास नाका तोंडावर अगदी व्यवस्थित मास्क परिधान करावे, असे डॉक्टर सांगतात.

मास्क आवश्यकच...पण असे करा त्वचेचे रक्षण

मास्क वापर करणाऱ्याच्या त्वचेवरही ॲलर्जीचे स्वरूप ठरलेले असते. तेलगट त्वचा असणाऱ्यांना याचा त्रास अधिक होऊ शकतो. घामामुळे फंगल इंफेक्शन होऊ शकते, त्या ठिकाणी खास येणे, पुरळ उठणे असा त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत कॉटनचा मास्क वापरणे चांगले. तो नेहमी स्वच्छ करून वापरावा, वारंवार मास्कला हात लावू नये, दिवसातून बराच वेळ आपल्याला मास्क वापरावा लागत असेल तर काही वेळ काढून घाम स्वच्छ पुसून घ्यावा, महिलांनी अति मेकअप करून त्यावर मास्क घालू नये यामुळे ॲलर्जी अधिक होऊ शकते, असे त्वचाविकार तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोट

स्वच्छ मास्कच वापरा

मास्कमुळे होणारी ॲलर्जी ही तीन प्रकारांवर अवलंबून असते, एक म्हणजे वापरणाऱ्याची त्वचा, मास्क कोणत्या प्रकारचा वापरला जातोय ती आणि तिसरी म्हणजे मास्कचा आपण किती वेळ वापरतो. अशा स्थितीत पुरळ येणे, खाज सुटणे, जागा काळी पडणे असे त्रास उद्भवू शकतात. अशा स्थितीत आरोग्य कर्मचारी नसाल तर कॉटनचा मास्क वापरावा तो स्वच्छ धुऊनच वापरावा, काही काळ तो काढून चेहरा स्वच्छ करावा. - डॉ. स्नेहल लोळगे, वरिष्ठ निवासी, त्वचारोग विभाग जीएमसी

सॅनिटायझरपेक्षा साबण बरे

- वारंवार सॅनिटायझरचाही वापर केल्याने हाताला त्रास होऊ शकतो, अशा वेळी लवकर उपलब्ध होत असेल तर साबणानचे हात स्वच्छ धुवावे.

- सॅनिटायझरमध्येही ७० टक्के अल्कोहोल असल्यावरच ते विषाणूला मारू शकते.

- साबण नसेल आणि हात स्वच्छ करायचे असतील तर मात्र, सॅनिटायझर वापरावे ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी शक्यतोवर वापरू नये, मात्र, तोपर्यंत नाका-तोंडाला हात लावू नये.