शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मुलींच्या भेटीसाठी आलेल्या विवाहितेला घरातून हाकलून लावल्याच्या संतापात रेल्वेखाली केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सासरच्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी असलेली माधुरी राजेंद्र पाटील (वय ३१, रा.आव्हाणे, ता.जळगाव) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सासरच्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी असलेली माधुरी राजेंद्र पाटील (वय ३१, रा.आव्हाणे, ता.जळगाव) ही विवाहिता पतीकडे असलेल्या मुलींना भेटायला आली, मात्र सासरच्यांनी मायलेकींची भेट होऊ न देता उलट घरातून हाकलून लावले. या संतापात माधुरीने प्रेम नगरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली झोकून देत स्वत:लाच संपवून घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली. दरम्यान, तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पती राजेंद्र दिलीप जाधव याच्यासह चौघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र वामन पवार (वय ६२,रा.पढावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे) यांची मुलगी माधुरी हिचा विवाह २००७ मध्ये आव्हाणे येथील राजेंद्र दिलीप जाधव याच्याशी झाला होता. त्यांना श्रध्दा (वय ११) व पुर्वा (वय ७) अशा दोन मुली आहेत. दरम्यान, माधुरी हिला मुलीच होतात, मुलगा का होत नाही म्हणून पती व सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. पहिली मुलगी जन्माला आली तेव्हा चार महिने तिला बघायलाही आले नाही. त्यासोबतच दूधाच्या व्यवसायासाठी माहेरुन पैशाचीही मागणी होऊ लागली. सतत तिला अपमानास्पद वागणुक मिळायला सुरुवात झाली. अशातच दुसऱ्यांदाही मुलगीच झाली. तुला मुलगा का होत नाही म्हणून तिचा अधिकच छळ होऊ लागला. या छळाला कंटाळल्याने माधुरी हिने शिंदखेडा न्यायालयात खासगी खटला दाखल केला.

मोलकरीण म्हणून नांदायला तयार, तरीही दिला नकार

माधुरी हिचा भाऊ श्रीकांत यांनी ‘लोकमत’ सांगितले की, राजेंद्र याचे बाहेर एका महिलेशी संबंध होते, असा आम्हाला संशय आहे. शिंदखेडा येथे न्यायालयात तारखेवर येत असताना तो बहिणीला त्या महिलेचा फोटो दाखवत होता. त्यामुळे बहिणीचा संताप व चिडचिड अधिक होत होती. दोन्ही मुलींमध्ये जीव असल्याने तुम्हाला तिच्याशी लग्न करायचे तर करा..तिच्यासोबत आनंदाने रहा..मी पण तुमच्या घरात राहील..बायको म्हणून नांदवत नसाल तर नको नांदवू, मोलकरीण म्हणून राहून धुणी, भांडी करेल पण नवऱ्याच्याच घरी नांदेल अशी भूमिका घेऊन तिने पतीला सांगितले होते. आम्हाला देखील तिने हा विषय सांगितला होता, त्यामुळे आम्हीही तिच्या या निर्णयाला अनुमती दिली होती. पण पती तिला नांदवायला तयारच नव्हता. घटस्फोटाचाच प्रस्ताव त्याने ठेवला होता, असे श्रीकांत यांनी सांगितले.