शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळ्यातील बाजार भरतोय निवृत्ती नगरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत; मात्र तरीही अनेक भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गल्लीबोळात आता बाजार सुरू केले आहेत. शहरातील पिंप्राळा परिसरातील बुधवारी भरणारा बाजार आता निवृत्तीनगरात भरत असून, याबाबत मनपा प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांसह अनेकांनी तक्रार केल्यावर देखील या ठिकाणी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी दर बुधवारी शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.

महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील नऊ जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. तसेच आठवडे बाजार देखील रद्द करून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीही शहरातील गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. हरी विठ्ठल भागातील आठवडे बाजार जरी बंद असला तरी या भागातील इतर परिसरांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी खुल्या भूखंडांवर अतिक्रमण करून आता बाजार भरवणे सुरू केले आहे. निवृत्तीनगरात देखील अनेक दिवसांपासून नियमितपणे बाजार भरत आहे. या बाजारात शहरातील दादावाडी, निवृत्ती नगर, खोटे नगर, प्रेम नगर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, अष्टभुजा नगर व इतर परिसरातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक भाजीपाला विक्रेत्यांना मास्क देखील लावलेला नसतो.

मनपाकडून कारवाई नाहीच, पावत्या फाडण्याचे काम मात्र सुरू

निवृत्तीनगरात भरत असलेल्या बाजाराबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र मनपा प्रशासनाकडून या भागात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. या ठिकाणी बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांकडून विक्रेत्यांच्या पावत्या फाडण्यात आल्या. यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातील विशिष्ट भागातीलच विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचाही आरोप आता मनपा प्रशासनावर केला जात आहे. या भागात विक्रेत्यासह शेकडो नागरिकांचीही गर्दी असते. तरीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.