शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पिंप्राळ्यातील बाजार भरतोय निवृत्ती नगरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत; मात्र तरीही अनेक भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गल्लीबोळात आता बाजार सुरू केले आहेत. शहरातील पिंप्राळा परिसरातील बुधवारी भरणारा बाजार आता निवृत्तीनगरात भरत असून, याबाबत मनपा प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांसह अनेकांनी तक्रार केल्यावर देखील या ठिकाणी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी दर बुधवारी शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.

महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील नऊ जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. तसेच आठवडे बाजार देखील रद्द करून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीही शहरातील गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. हरी विठ्ठल भागातील आठवडे बाजार जरी बंद असला तरी या भागातील इतर परिसरांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी खुल्या भूखंडांवर अतिक्रमण करून आता बाजार भरवणे सुरू केले आहे. निवृत्तीनगरात देखील अनेक दिवसांपासून नियमितपणे बाजार भरत आहे. या बाजारात शहरातील दादावाडी, निवृत्ती नगर, खोटे नगर, प्रेम नगर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, अष्टभुजा नगर व इतर परिसरातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक भाजीपाला विक्रेत्यांना मास्क देखील लावलेला नसतो.

मनपाकडून कारवाई नाहीच, पावत्या फाडण्याचे काम मात्र सुरू

निवृत्तीनगरात भरत असलेल्या बाजाराबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र मनपा प्रशासनाकडून या भागात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. या ठिकाणी बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांकडून विक्रेत्यांच्या पावत्या फाडण्यात आल्या. यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातील विशिष्ट भागातीलच विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचाही आरोप आता मनपा प्रशासनावर केला जात आहे. या भागात विक्रेत्यासह शेकडो नागरिकांचीही गर्दी असते. तरीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.