शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पिंप्राळ्यातील बाजार भरतोय निवृत्ती नगरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्हा प्रशासनाकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत; मात्र तरीही अनेक भाजीपाला विक्रेत्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गल्लीबोळात आता बाजार सुरू केले आहेत. शहरातील पिंप्राळा परिसरातील बुधवारी भरणारा बाजार आता निवृत्तीनगरात भरत असून, याबाबत मनपा प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांसह अनेकांनी तक्रार केल्यावर देखील या ठिकाणी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी दर बुधवारी शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.

महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील गर्दी कमी करण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांना शहरातील नऊ जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. तसेच आठवडे बाजार देखील रद्द करून इतर ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे; मात्र तरीही शहरातील गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहेत. हरी विठ्ठल भागातील आठवडे बाजार जरी बंद असला तरी या भागातील इतर परिसरांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांनी खुल्या भूखंडांवर अतिक्रमण करून आता बाजार भरवणे सुरू केले आहे. निवृत्तीनगरात देखील अनेक दिवसांपासून नियमितपणे बाजार भरत आहे. या बाजारात शहरातील दादावाडी, निवृत्ती नगर, खोटे नगर, प्रेम नगर, एसएमआयटी महाविद्यालय परिसर, अष्टभुजा नगर व इतर परिसरातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक भाजीपाला विक्रेत्यांना मास्क देखील लावलेला नसतो.

मनपाकडून कारवाई नाहीच, पावत्या फाडण्याचे काम मात्र सुरू

निवृत्तीनगरात भरत असलेल्या बाजाराबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र मनपा प्रशासनाकडून या भागात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. या ठिकाणी बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांकडून विक्रेत्यांच्या पावत्या फाडण्यात आल्या. यामुळे मनपा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहरातील विशिष्ट भागातीलच विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याचाही आरोप आता मनपा प्रशासनावर केला जात आहे. या भागात विक्रेत्यासह शेकडो नागरिकांचीही गर्दी असते. तरीही कारवाई का केली जात नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.