शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दिलेल्या उघडीपीच्या वेळेत बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:32 IST

दिवाळीच्या खरेदीला आला अडथळा : ग्राहकांची गैरसोय, विक्रेत्यांची झाली फजिती

भुसावळ : सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाहिजे तशी लगबग रेलचेल दिसली नाही. परंतु पावसाने थोडी उघडीप देताच लक्ष्मीपूजनासाठी लागणारी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात गर्दी उसळली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार तर काही वेळ मुसळधार अशा पावसामुळे नागरिकांची आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारच्या वेळेस पावसाने थोडीशी उसंत दिल्याने नागरिकांनी लगबगीने दिवाळीची खरेदी केली. येथील आठवडे बाजारात दिवाळी सणानिमित्त दोन पैसे खिशात जातील या आसेपोटी ग्रामीण भागातील अनेक विक्रेते तसेच व्यवसायिकांनी अगदी रस्त्यावर दुकाने थाटली होती. परंतु पावसामुळे बराच वेळ ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी बाजारपेठेत उठाव कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गतवर्षी अवर्षणाच्या स्थितीचे बाजारपेठेवर सावट होते. यंदा मात्र पावसाचे सावट असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर भर देत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र दिवसभरात जेव्हा जेव्हा पावसाचा वेग मंदावला तसेच पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली त्यावेळेची संधी साधत अनेकांनी बाजारपेठ गाठली. यातच मध्येच पाऊस आल्यास ग्राहकांना दुकानांच्या आडोशाचा आधार घ्यावा लागला.तर किरकोळ विक्रेत्यांना आपला माल प्लॅस्टीकच्या कापडाने झाकण्याची कसरत वारंवार करावी लागली.आॅनलाइन खरेदीचा परिणामदीपोत्सवा साठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी युवकांसह जवळपास सर्वच नागरिक आॅनलाइनचा आधार घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. धावपळीच्या युगात प्रत्येक जण कामात व्यस्त असताना अशा परिस्थितीत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र सर्वच जण वेळ काढून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतच दाखल होत असतात. दरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट देण्यात येत आहे.अंगणी पाणीच पाणी, रांगोळी काढावी कशी ?पावसामुळे शहरासह परिसरातील रस्ते चिखलमय झाले असून या पावसामुळे घराघरात साथीच्या आजाराचे रुग्ण दिसून येत असून त्यामुळेही दिवाळीचा उत्साह काहीसा कमी झाला असून घराबाहेर चिखलमय परिस्थिती असल्यामुळे नेमकी रांगोळी काढावी तरी कशी ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे मात्र महिलांच्या उत्सवावार पाणी फिरले आहे. भर दिवाळीत रांगोळी विना अंगण पाहताना गृहिणींना खटकणारे ठरत आहे. बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहे. याला अपवाद फक्त जी मोठी घरे आहेत व त्याघरांना पोर्च आहे, अशा ठिकाणी फक्त रांगोळी काढलेली दिसून आली.