शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पावसाने दिलेल्या उघडीपीच्या वेळेत बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 21:32 IST

दिवाळीच्या खरेदीला आला अडथळा : ग्राहकांची गैरसोय, विक्रेत्यांची झाली फजिती

भुसावळ : सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाहिजे तशी लगबग रेलचेल दिसली नाही. परंतु पावसाने थोडी उघडीप देताच लक्ष्मीपूजनासाठी लागणारी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात गर्दी उसळली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार तर काही वेळ मुसळधार अशा पावसामुळे नागरिकांची आणि विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारच्या वेळेस पावसाने थोडीशी उसंत दिल्याने नागरिकांनी लगबगीने दिवाळीची खरेदी केली. येथील आठवडे बाजारात दिवाळी सणानिमित्त दोन पैसे खिशात जातील या आसेपोटी ग्रामीण भागातील अनेक विक्रेते तसेच व्यवसायिकांनी अगदी रस्त्यावर दुकाने थाटली होती. परंतु पावसामुळे बराच वेळ ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी बाजारपेठेत उठाव कमी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गतवर्षी अवर्षणाच्या स्थितीचे बाजारपेठेवर सावट होते. यंदा मात्र पावसाचे सावट असल्याचा विरोधाभास दिसून येत आहे. पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यावर भर देत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र दिवसभरात जेव्हा जेव्हा पावसाचा वेग मंदावला तसेच पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतली त्यावेळेची संधी साधत अनेकांनी बाजारपेठ गाठली. यातच मध्येच पाऊस आल्यास ग्राहकांना दुकानांच्या आडोशाचा आधार घ्यावा लागला.तर किरकोळ विक्रेत्यांना आपला माल प्लॅस्टीकच्या कापडाने झाकण्याची कसरत वारंवार करावी लागली.आॅनलाइन खरेदीचा परिणामदीपोत्सवा साठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी युवकांसह जवळपास सर्वच नागरिक आॅनलाइनचा आधार घेत असल्याचे सध्या दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत काहीसा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. धावपळीच्या युगात प्रत्येक जण कामात व्यस्त असताना अशा परिस्थितीत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र सर्वच जण वेळ काढून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतच दाखल होत असतात. दरम्यान ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट देण्यात येत आहे.अंगणी पाणीच पाणी, रांगोळी काढावी कशी ?पावसामुळे शहरासह परिसरातील रस्ते चिखलमय झाले असून या पावसामुळे घराघरात साथीच्या आजाराचे रुग्ण दिसून येत असून त्यामुळेही दिवाळीचा उत्साह काहीसा कमी झाला असून घराबाहेर चिखलमय परिस्थिती असल्यामुळे नेमकी रांगोळी काढावी तरी कशी ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे मात्र महिलांच्या उत्सवावार पाणी फिरले आहे. भर दिवाळीत रांगोळी विना अंगण पाहताना गृहिणींना खटकणारे ठरत आहे. बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती यंदाच्या दिवाळीत दिसून येत आहे. याला अपवाद फक्त जी मोठी घरे आहेत व त्याघरांना पोर्च आहे, अशा ठिकाणी फक्त रांगोळी काढलेली दिसून आली.