शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शेतमालाची आवक वाढल्याने बाजार समिती गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:08 IST

चाळीसगाव : खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धांदल

ठळक मुद्देगेल्या तीन ते चार वर्षांपासूून चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत आहे. बाजार समितीने तीन वर्षांपूर्वी स्वतंत्र कांदा मार्केट सुरू केल्याने कन्नड, नांदगाव येथून कांदा विक्रीसाठी बाजार समितीत येतो. मात्र गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर कोसळले मका वगळता गहू, बाजरी, ज्वारी आदी धान्य मालाची आवक मंदावली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ज्वारी ५०० ते ६०० क्विंटल, बाजरी ४५० ते ५०० क्विंटल, गहू २०० ते ३०० क्विंटल आवक होत आहे. मात्र मका, कांदा आणि केळी मालाचा ओघ चांगला आहे.एकीकडे पाण्याअभावी केळी बागांनी माना टाकल्या असताना पाणी नसल्यानेही उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. बागायती पट्ट्यात मात्र केळीने शेतकºयांना हात दिला आहे. बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून नवती, कांदेबाग लागवडीतील केळी मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्य

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : खरीप हंगामाची लगबग, मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला झालेली सुरुवात या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणल्याने बुधवारी बाजार समिती गजबजून गेली होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत गत आठ दिवसात बाजार समितीत आवक वाढली असल्याचे आडत व्यापाºयांनी सांगितले.चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा केला जातो. १५ मे नंतर शेतकरी पेरते होतात. यंदा जलपातळी खालावली आणि सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट असल्याने मान्सूनपूर्व अर्थाचच धूळपेरणीवर परिणाम होणार आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असल्याने बी-बियाणे, खते विकत घेण्यासाठी शेतकºयांनी शेतमाल विक्रीस काढला आहे. यामुळेच बाजार समितीत धान्याची आवक वधारली असून, तेजीची झळाळीदेखील आहे.मका, ज्वारी, बाजरी, कांदे, गहू आणि केळीची आवक होत आहे.मक्याला झळाळीगत हंगामात तालुक्यात ८७ टक्केच पर्जन्यमान झाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरी ‘मक्या’ने शेतकºयांना तारले आहे. मक्याचा ओघ सुरुच असून, तो कोरडा असल्याने दरही वाढले आहेत. १ हजार ५० ते १ हजार १९५ रुपये प्रति क्विंटलने बुधवारी मक्याचे लिलाव पुकारले गेले. दरदिवशी १४०ते१५० ट्रॅक्ट्रर मक्याची आवक होत आहे.गहू, बाजरीलाही तेजीज्वारी, बाजरी, गहू आदी धान्य मालाची आवक फारशी नसल्याने दरांमध्ये तेजी आली आहे. ज्वारी एक हजार ते एक हजार ४००, बाजरी ९०० ते एक हजार ३५०, गहू एक हजार ७०० ते दोन हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असे भाव आहेत. दरांमध्ये तेजी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.बुधवारी बाजार समितीत फळ बाजार ‘केळीमय’ झाल्याचा पहावयास मिळाला. चांगल्या प्रतीच्या केळीची तोड झाल्यानंतर व्यापारी बागेतच खरेदी करतात. दुय्यम प्रतीचा माल शेतकºयांना बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा लागतो.२० रोजीच्या केळी लिलावात तेजीची झळाळी होती. २० घडांना अडीच हजारांचा भाव मिळाला. उन्हाचा दाह वाढल्याने गेल्या चार दिवसात हे दर खाली कोसळले आहेत. बुधवारी उच्चांकी आवक होऊनही २० घडांना अवघा ७०० रुपयांचा भाव मिळाला.खरीप हंगामाच्या तयारीला वेग आल्याने शेतकºयांनी बी-बियाणे व खते विकत घेण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आणला आहे. यामुळे बाजार समिती गजबजून गेली आहे.- अशोक पाटीलसचिव, बाजार समिती, चाळीसगाव 

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव