शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतमालाची आवक वाढल्याने बाजार समिती गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:08 IST

चाळीसगाव : खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धांदल

ठळक मुद्देगेल्या तीन ते चार वर्षांपासूून चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत आहे. बाजार समितीने तीन वर्षांपूर्वी स्वतंत्र कांदा मार्केट सुरू केल्याने कन्नड, नांदगाव येथून कांदा विक्रीसाठी बाजार समितीत येतो. मात्र गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर कोसळले मका वगळता गहू, बाजरी, ज्वारी आदी धान्य मालाची आवक मंदावली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ज्वारी ५०० ते ६०० क्विंटल, बाजरी ४५० ते ५०० क्विंटल, गहू २०० ते ३०० क्विंटल आवक होत आहे. मात्र मका, कांदा आणि केळी मालाचा ओघ चांगला आहे.एकीकडे पाण्याअभावी केळी बागांनी माना टाकल्या असताना पाणी नसल्यानेही उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. बागायती पट्ट्यात मात्र केळीने शेतकºयांना हात दिला आहे. बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून नवती, कांदेबाग लागवडीतील केळी मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्य

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : खरीप हंगामाची लगबग, मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला झालेली सुरुवात या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणल्याने बुधवारी बाजार समिती गजबजून गेली होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत गत आठ दिवसात बाजार समितीत आवक वाढली असल्याचे आडत व्यापाºयांनी सांगितले.चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा केला जातो. १५ मे नंतर शेतकरी पेरते होतात. यंदा जलपातळी खालावली आणि सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट असल्याने मान्सूनपूर्व अर्थाचच धूळपेरणीवर परिणाम होणार आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असल्याने बी-बियाणे, खते विकत घेण्यासाठी शेतकºयांनी शेतमाल विक्रीस काढला आहे. यामुळेच बाजार समितीत धान्याची आवक वधारली असून, तेजीची झळाळीदेखील आहे.मका, ज्वारी, बाजरी, कांदे, गहू आणि केळीची आवक होत आहे.मक्याला झळाळीगत हंगामात तालुक्यात ८७ टक्केच पर्जन्यमान झाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरी ‘मक्या’ने शेतकºयांना तारले आहे. मक्याचा ओघ सुरुच असून, तो कोरडा असल्याने दरही वाढले आहेत. १ हजार ५० ते १ हजार १९५ रुपये प्रति क्विंटलने बुधवारी मक्याचे लिलाव पुकारले गेले. दरदिवशी १४०ते१५० ट्रॅक्ट्रर मक्याची आवक होत आहे.गहू, बाजरीलाही तेजीज्वारी, बाजरी, गहू आदी धान्य मालाची आवक फारशी नसल्याने दरांमध्ये तेजी आली आहे. ज्वारी एक हजार ते एक हजार ४००, बाजरी ९०० ते एक हजार ३५०, गहू एक हजार ७०० ते दोन हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असे भाव आहेत. दरांमध्ये तेजी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.बुधवारी बाजार समितीत फळ बाजार ‘केळीमय’ झाल्याचा पहावयास मिळाला. चांगल्या प्रतीच्या केळीची तोड झाल्यानंतर व्यापारी बागेतच खरेदी करतात. दुय्यम प्रतीचा माल शेतकºयांना बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा लागतो.२० रोजीच्या केळी लिलावात तेजीची झळाळी होती. २० घडांना अडीच हजारांचा भाव मिळाला. उन्हाचा दाह वाढल्याने गेल्या चार दिवसात हे दर खाली कोसळले आहेत. बुधवारी उच्चांकी आवक होऊनही २० घडांना अवघा ७०० रुपयांचा भाव मिळाला.खरीप हंगामाच्या तयारीला वेग आल्याने शेतकºयांनी बी-बियाणे व खते विकत घेण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आणला आहे. यामुळे बाजार समिती गजबजून गेली आहे.- अशोक पाटीलसचिव, बाजार समिती, चाळीसगाव 

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव