शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर झालेली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर झालेली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व लेखक डॉ. नरसिंग परदेशी यांनी केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त नोबेल फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल पवार उपस्थित होते.

पुढे बोलताना परदेशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्राचीन काळापासून सुजलाम सुफलाम राज्य आहे. प्राचीन काळात महाजनपदे ,वाकाटक यांसारख्या संस्कृतीमध्ये मराठी विभाग संपन्न आणि सुखी भूभाग म्हणून ओळखला जातो. मराठी या शब्दाची उत्पत्ती मऱ्हाटी या शब्दापासून झालेली आहे. मराठी मातीमध्ये कालिदासाच्या मेघदूत काव्याच्या लिखाणाचा इतिहास दडलेला आहे. नेवासा, गंगापूर ,नागपूर या ठिकाणी प्राचीन युगाचे अवशेष सापडतात. मराठी मातीने फक्त परकीय आक्रमणे परतवले नसून सांस्कृतिक बदलांनादेखील तोंड दिलेले आहे. मराठी मातीची संत परंपरा जगभर अजरामर आहे. भगवद्गीतेचे मराठी भाषांतर स्थानिक लोकांना समजेल अशा भाषेत संत ज्ञानेश्वरांनी लिखाण करून मराठी भाषेला समृद्ध केलेले आहे. आजपर्यंतच्या भारतीय उपखंडाच्या इतिहासात मराठ्यांनी निर्माण केलेले साम्राज्य इतके मोठे साम्राज्य कोणत्याही राज्यकर्त्यांना करता आलेले नाही.

याप्रसंगी उपायुक्त कपिल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.