शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर झालेली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मराठी माती अनेक आक्रमणं परतवून लावल्यामुळेच अजरामर झालेली आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व लेखक डॉ. नरसिंग परदेशी यांनी केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त नोबेल फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त कपिल पवार उपस्थित होते.

पुढे बोलताना परदेशी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्राचीन काळापासून सुजलाम सुफलाम राज्य आहे. प्राचीन काळात महाजनपदे ,वाकाटक यांसारख्या संस्कृतीमध्ये मराठी विभाग संपन्न आणि सुखी भूभाग म्हणून ओळखला जातो. मराठी या शब्दाची उत्पत्ती मऱ्हाटी या शब्दापासून झालेली आहे. मराठी मातीमध्ये कालिदासाच्या मेघदूत काव्याच्या लिखाणाचा इतिहास दडलेला आहे. नेवासा, गंगापूर ,नागपूर या ठिकाणी प्राचीन युगाचे अवशेष सापडतात. मराठी मातीने फक्त परकीय आक्रमणे परतवले नसून सांस्कृतिक बदलांनादेखील तोंड दिलेले आहे. मराठी मातीची संत परंपरा जगभर अजरामर आहे. भगवद्गीतेचे मराठी भाषांतर स्थानिक लोकांना समजेल अशा भाषेत संत ज्ञानेश्वरांनी लिखाण करून मराठी भाषेला समृद्ध केलेले आहे. आजपर्यंतच्या भारतीय उपखंडाच्या इतिहासात मराठ्यांनी निर्माण केलेले साम्राज्य इतके मोठे साम्राज्य कोणत्याही राज्यकर्त्यांना करता आलेले नाही.

याप्रसंगी उपायुक्त कपिल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.