शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शिवाजीनगर उड्डाणपुलाचा तिढा सोडविण्यासाठी चार दिवसांत मनपात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

पालकमंत्र्यांची माहिती : लवकरच तोडगा काढणार, बांधकाममंत्र्यांशीही करणार चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा बिघडत जात ...

पालकमंत्र्यांची माहिती : लवकरच तोडगा काढणार, बांधकाममंत्र्यांशीही करणार चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचा बिघडत जात असलेला तिढा सोडविण्यासाठी चार दिवसांत महापालिकेत प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. अनेक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बाबतीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता आदी उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाणपुलाचा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पुलाला अडथळा ठरत असलेले विद्युत खांब हटविण्याच्या कामासाठी लागणारा निधी बांधकाम विभागाने उपलब्ध करून द्यावा, असा ठराव गुरुवारी झालेल्या महासभेत करण्यात आला. याबाबतच शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेत, यावर तोडगा काढण्याची तयारी दर्शविली आहे.

मनपातील बैठकीत होणार निर्णय?

शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसला तरी महावितरण, मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा उपस्थितीत आढावा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत दीड कोटी रुपयांचा निधी कोणी द्यावा व विद्युत खांब हटविण्याचे काम कोणी करावे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच गरज पडल्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन निधीची मागणी केली जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

लोकवर्गणीतून निधी उभारणार : नगरसेवकांची भूमिका

शिवाजीनगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडून निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने, या पुलाचे काम लांबतच जात आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागातील नगरसेवकांनी विद्युत खांब हटविण्यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून उभारण्याची तयारी केली आहे. याबाबत १७ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर भागातील सर्व नगरसेवकांची बैठक होणार असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली. तसेच मनपा आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर खाते उघडण्यात येणार असल्याचेही ॲड. पोकळे यांनी सांगितले.