शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
7
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
8
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
9
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
10
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
11
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
12
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
13
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
14
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
15
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
16
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
17
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
19
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
20
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली

मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:40 IST

मुक्ताईनगर जि. जळगाव येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा प्रविण पाटील यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली तर माजी सरंपच ललीत महाजन आणि डॉ. प्रदीप पाटील यांंची स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या नजमा तडवी यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार आज स्विकारला.

ठळक मुद्देनिवडणुकीनंतर तब्बल महिन्याभराने नगराध्यक्षांनी सांभाळला पदभारदोन जणांची स्विकृत सदस्यपदी निवड

मुक्ताईनगर : येथे उपनगराध्यक्षपदी मनिषा प्रवीण पाटील यांची शनिवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीच्या एक महिन्यानंतर नगराध्यक्षाचा पदभार आज नजमा तडवी यांनी स्विकारला.स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये १७ पैकी १३ जागांवर भाजपाने विजय मिळवला. तसेच एक अपक्षही त्यांच्याकडे गेल्याने एकूण १४ जागा जिंकत तसेच नगराध्यक्ष पदावर देखील उमेदवार निवडून आणत भारतीय जनता पक्षाने आपला वरचष्मा कायम ठेवला होता.दरम्यान, तब्बल महिनाभरानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत उपनगराध्यक्षाची निवड करण्यात आली. या पदासाठी नगरसेवक निलेश शिरसाठ यांनी नगरसेविका मनिषा प्रविण पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून माजी सरपंच ललीत शांताराम महाजन व डॉ. प्रदीप पाटील यांच्या नावाची शिफारस नगरसेवकांमधून करण्यात आली व त्यास देखील सर्वच नगरसेवकांनी अनुमोदन देऊन दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले . नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या निधनामुळे सात दिवसांचा दुखवटा संपूर्ण भारतभर असल्याने कोणत्याही प्रकारचे स्वागत समारंभ यास फाटा देत नगराध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला. तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांच्या निवडीची घोषणा नगराध्यक्षांनी बैठकीत केली . यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा तडवी यांनी प्रथमच कामकाज सांभाळले . याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भोसले यांनी काम पाहिले.आठ महिन्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायतचा कार्यभार हा सुरळीत सुरू झाल्याने शहरातील विविध रखडलेली विकासकामे, स्वच्छता , आरोग्य, गटारी, पाणी यासारख्या समस्यांवर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा नागरिकांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Politicsराजकारण