शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे विक्री घटल्याने आंब्याचे दरही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची ...

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची आवक जोरात होती आणि विक्रीही जोरात होती. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळी अकरापर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी असल्यामुळे ग्राहक कमी होऊन, आब्यांची विक्री घटली आहे तसेच दरही घटले आहेत. संचारबंदीमुळे माल पडून असल्याने दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती शहरातील आंबा विक्रेत्या व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या एक महिन्यापासून आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, सध्या बाजारपेठेत रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, गुजरात केशर, कर्नाटक हापूस, बेंगन फल्ली, गुलाब खश आदी प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. उन्हाळ्यातील या दिवसात आंबा विक्रीचा व्यवसाय जोरात असतो. बाहेरून मालाची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, याच दिवसात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने पुन्हा आंबा विक्रेत्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच फटका बसला आहे. संचारबंदीपूर्वी भरलेला माल आता संचारबंदी लागू झाल्याने विक्री होत नसल्याने अंगावर पडला आहे. यामुळे भांडवल अडकले असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आंब्याची विक्री होत नसल्याने काही माल नाशवंत होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. सकाळी अकरापर्यंत ग्राहक खरेदीला येतात. मात्र, म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो:

पूर्वीप्रमाणे वेळ लागू करण्याची मागणी

शासनाने संचारबंदीत सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसायासाठी लागू केलेल्या वेळेत फारसा व्यवसाय होत नाही. त्यामुळे दुकानाचा दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यात लवकर माल विक्री होत नसल्याने, माल नाशवंत होऊन आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे व्यवसायाची सवलत देण्याची मागणीही या विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या संचारबंदीमुळे बाहेरून येणाऱ्या आंब्याची आवक कमी झाली असून, विक्रीही घटली आहे. तसेच सर्वप्रकारच्या आंब्याचे दरही कमी झाले आहेत. सद्यस्थितीत दुकाने उघडण्याची वेळ कमी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे.

- मौसीन पठाण, व्यावसायिका

शासनाने व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे गरजेचे आहे. तेव्हाच चांगला व्यवसाय होईल. सध्या दिलेली वेळ ही अपुरी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

- इम्रान खान, व्यावसायिक