शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

संचारबंदीमुळे विक्री घटल्याने आंब्याचे दरही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची ...

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची आवक जोरात होती आणि विक्रीही जोरात होती. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळी अकरापर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी असल्यामुळे ग्राहक कमी होऊन, आब्यांची विक्री घटली आहे तसेच दरही घटले आहेत. संचारबंदीमुळे माल पडून असल्याने दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती शहरातील आंबा विक्रेत्या व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या एक महिन्यापासून आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, सध्या बाजारपेठेत रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, गुजरात केशर, कर्नाटक हापूस, बेंगन फल्ली, गुलाब खश आदी प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. उन्हाळ्यातील या दिवसात आंबा विक्रीचा व्यवसाय जोरात असतो. बाहेरून मालाची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, याच दिवसात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने पुन्हा आंबा विक्रेत्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच फटका बसला आहे. संचारबंदीपूर्वी भरलेला माल आता संचारबंदी लागू झाल्याने विक्री होत नसल्याने अंगावर पडला आहे. यामुळे भांडवल अडकले असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आंब्याची विक्री होत नसल्याने काही माल नाशवंत होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. सकाळी अकरापर्यंत ग्राहक खरेदीला येतात. मात्र, म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो:

पूर्वीप्रमाणे वेळ लागू करण्याची मागणी

शासनाने संचारबंदीत सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसायासाठी लागू केलेल्या वेळेत फारसा व्यवसाय होत नाही. त्यामुळे दुकानाचा दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यात लवकर माल विक्री होत नसल्याने, माल नाशवंत होऊन आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे व्यवसायाची सवलत देण्याची मागणीही या विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या संचारबंदीमुळे बाहेरून येणाऱ्या आंब्याची आवक कमी झाली असून, विक्रीही घटली आहे. तसेच सर्वप्रकारच्या आंब्याचे दरही कमी झाले आहेत. सद्यस्थितीत दुकाने उघडण्याची वेळ कमी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे.

- मौसीन पठाण, व्यावसायिका

शासनाने व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे गरजेचे आहे. तेव्हाच चांगला व्यवसाय होईल. सध्या दिलेली वेळ ही अपुरी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

- इम्रान खान, व्यावसायिक