शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे विक्री घटल्याने आंब्याचे दरही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची ...

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची आवक जोरात होती आणि विक्रीही जोरात होती. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळी अकरापर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी असल्यामुळे ग्राहक कमी होऊन, आब्यांची विक्री घटली आहे तसेच दरही घटले आहेत. संचारबंदीमुळे माल पडून असल्याने दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती शहरातील आंबा विक्रेत्या व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या एक महिन्यापासून आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, सध्या बाजारपेठेत रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, गुजरात केशर, कर्नाटक हापूस, बेंगन फल्ली, गुलाब खश आदी प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. उन्हाळ्यातील या दिवसात आंबा विक्रीचा व्यवसाय जोरात असतो. बाहेरून मालाची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, याच दिवसात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने पुन्हा आंबा विक्रेत्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच फटका बसला आहे. संचारबंदीपूर्वी भरलेला माल आता संचारबंदी लागू झाल्याने विक्री होत नसल्याने अंगावर पडला आहे. यामुळे भांडवल अडकले असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आंब्याची विक्री होत नसल्याने काही माल नाशवंत होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. सकाळी अकरापर्यंत ग्राहक खरेदीला येतात. मात्र, म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो:

पूर्वीप्रमाणे वेळ लागू करण्याची मागणी

शासनाने संचारबंदीत सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसायासाठी लागू केलेल्या वेळेत फारसा व्यवसाय होत नाही. त्यामुळे दुकानाचा दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यात लवकर माल विक्री होत नसल्याने, माल नाशवंत होऊन आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे व्यवसायाची सवलत देण्याची मागणीही या विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या संचारबंदीमुळे बाहेरून येणाऱ्या आंब्याची आवक कमी झाली असून, विक्रीही घटली आहे. तसेच सर्वप्रकारच्या आंब्याचे दरही कमी झाले आहेत. सद्यस्थितीत दुकाने उघडण्याची वेळ कमी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे.

- मौसीन पठाण, व्यावसायिका

शासनाने व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे गरजेचे आहे. तेव्हाच चांगला व्यवसाय होईल. सध्या दिलेली वेळ ही अपुरी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

- इम्रान खान, व्यावसायिक