शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

संचारबंदीमुळे विक्री घटल्याने आंब्याचे दरही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची ...

कोरोना परिणाम : माल पडून असल्याने दररोज होतेय हजारो रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : संचारबंदीपूर्वी आंब्याची आवक जोरात होती आणि विक्रीही जोरात होती. मात्र, संचारबंदी लागू झाल्यापासून सकाळी अकरापर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी असल्यामुळे ग्राहक कमी होऊन, आब्यांची विक्री घटली आहे तसेच दरही घटले आहेत. संचारबंदीमुळे माल पडून असल्याने दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती शहरातील आंबा विक्रेत्या व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या एक महिन्यापासून आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, सध्या बाजारपेठेत रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, गुजरात केशर, कर्नाटक हापूस, बेंगन फल्ली, गुलाब खश आदी प्रकारचे आंबे विक्रीला आले आहेत. उन्हाळ्यातील या दिवसात आंबा विक्रीचा व्यवसाय जोरात असतो. बाहेरून मालाची आवकही मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, याच दिवसात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाल्याने पुन्हा आंबा विक्रेत्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच फटका बसला आहे. संचारबंदीपूर्वी भरलेला माल आता संचारबंदी लागू झाल्याने विक्री होत नसल्याने अंगावर पडला आहे. यामुळे भांडवल अडकले असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आंब्याची विक्री होत नसल्याने काही माल नाशवंत होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. सकाळी अकरापर्यंत ग्राहक खरेदीला येतात. मात्र, म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो:

पूर्वीप्रमाणे वेळ लागू करण्याची मागणी

शासनाने संचारबंदीत सकाळी सात ते अकरापर्यंत व्यवसायासाठी लागू केलेल्या वेळेत फारसा व्यवसाय होत नाही. त्यामुळे दुकानाचा दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यात लवकर माल विक्री होत नसल्याने, माल नाशवंत होऊन आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे व्यवसायाची सवलत देण्याची मागणीही या विक्रेत्यांतर्फे करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या संचारबंदीमुळे बाहेरून येणाऱ्या आंब्याची आवक कमी झाली असून, विक्रीही घटली आहे. तसेच सर्वप्रकारच्या आंब्याचे दरही कमी झाले आहेत. सद्यस्थितीत दुकाने उघडण्याची वेळ कमी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे.

- मौसीन पठाण, व्यावसायिका

शासनाने व्यवसायासाठी वेळ वाढवून देणे गरजेचे आहे. तेव्हाच चांगला व्यवसाय होईल. सध्या दिलेली वेळ ही अपुरी असल्याने, विक्रीवर परिणाम होऊन दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

- इम्रान खान, व्यावसायिक