शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मुक्ताई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 15:54 IST

देवदर्शनानंतर संतांचे दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, असा एक प्रवाह आहे. म्हणूनच रविवारी कामिका भागवत एकादशीनिमित्ताने श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांच्या मांदियाळीचा जनसागर श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे जमला होता.

ठळक मुद्देभर पावसात दर्शनाची ओढझपाझप पावले टाकत, मैल दर मैल अंतर पार करीत दिंड्या दाखलदर्शन बारीत एका वेळेस किमान १० हजार भाविक रांगेतदर्शनबारी मुक्ताई मंदिरापासून थेट नवे कोथळी-चांगदेव रस्त्यापर्यंतदर्शनासाठी लागलेल्या रांगेचा उच्चांक मोडणाराअपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्याने आयोजकांची दमछाकपंचक्रोशीतील ६० ते ६५ दिंड्या दाखल

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : देवदर्शनानंतर संतांचे दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, असा एक प्रवाह आहे. म्हणूनच रविवारी कामिका भागवत एकादशीनिमित्ताने श्री संत मुक्ताई दर्शनासाठी भाविकांच्या मांदियाळीचा जनसागर श्रीक्षेत्र कोथळी व मुक्ताईनगर येथे जमला होता. पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि भर पावसात दर्शनाची ओढ घेऊन झपाझप पाय टाकत मैल दर मैल अंतर पार करीत पायी दिंड्या येथे पोहचत होत्या.यंदा श्री क्षेत्र कोथळी येथे दर्शन बारीत एका वेळेस किमान १० हजार भाविक रांगेत उभे होते, तर ही दर्शनबारी मुक्ताई मंदिरापासून थेट नवे कोथळी-चांगदेव रस्त्यापर्यंत लागली होती. हा दर्शनासाठी लागलेल्या रांगेचा उच्चांक मोडणारा होता तर पूर्वानुुमान व अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्याने आयोजकांची दमछाक होत होती. एक बाजूची दर्शन रांग करून मुखदर्शनाने भविकांची गर्दी कमी करण्याचे नियोजन स्वयंसेवक करीत होते. गर्दीमुळे येथे आलेल्या पायी दिंड्यांचे मंदिर परिक्रमासाठी मोठी कसरत होत होती.पंढरीची वारी जायाचिये कुळी, त्यांची पाय धुळी लागे मजआषाढी एकादशीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनानंतर संत दर्शन झाल्याशिवाय आषाढी वारी पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. यानिमित्ताने दरवर्षी आषाढीसाठी पंढरपूर जाणारे भाविक विठ्ठल दर्शनानंतर येणाऱ्या परतीच्या एकादशीला परिसरातील संतांच्या दर्शनानंतर आषाढी वारी पूर्ण झाल्याचं आनंद मिळवतात. अशात परतीच्या एकादशीला वारकरी संत शिरोमणी संत मुक्ताई दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येथे दाखल होतात. यंदा दशमीलाच मोठ्या संख्येने भाविकांची येथे गर्दी झाली. मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांनी पहाटे काकड आरतीपासून दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनासाठी लागलेली रांग अगदी मुक्ताई मंदिरापासून थेट चांगदे रस्त्यापर्यंत पोहोचली. एका भाविकाला दर्शन घेण्यासाठी किमान चार ते पाच तास वेळ लागत होता. अनेक भाविक गर्दीमुळे मुखदर्शन घेऊन समाधान व्यक्त करीत होते. भाविकांची गर्दी सातत्याने वाढत होती. जेवढे भाविक दर्शन आटोपून परतत होते तेवढ्याच संख्येने नवीन भाविक दाखल होत होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत भाविकांची मांदियाळी येथे कायम होती. पहाटे प्रलहाद महादेव धुराळे यांच्या हस्ते महापूजा पार पडली, तर प्रल्हाद महाराज सुळेकर यांचे कीर्तन पार पडले. तसेच नवीन मुक्ताई मंदिरावर रवींद्र पाटील आणि ज्ञानेश्वर हरणे यांच्या हस्ते महापूजा झाली.६० ते ६५ दिंड्याएकादशीनिमित्त यंदा पंचक्रोशीतील ६० ते ६५ दिंड्या येथे दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या येथे आल्या होत्या. चिंब पावसात पायी चालणारे वारकरी मुक्ताई व विठू नामाचा जयघोष करीत दिंड्यांनी नगर प्रदक्षिणा केली. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर