शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

मांडकी खु ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 16:27 IST

ग्रामस्थांचे रस्त्यासाठी तहसीलदारांना साकडे

पाचोरा- तालुक्यातील मांडकी खुर्द गावाला रस्ताच नसल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याअभावी चिखलातून मार्ग काढत हाल सोसावे लागत आहे. याबाबत मांडकी ग्रामस्थांनी महिलांसह तहसीलदारांना निवेदन देऊन रस्त्यासाठी साकडे घातले आहे.मांडकी ग्रामस्थांनी तहसीलदार कैलास चावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांडकी हे गाव गिरणा नदी पात्रालागत असल्याने नदीमुळे गावाला धोका होत असतो. यासाठी शासनाने या गावाचे सन २००८-०९ साली पुनर्वसन केले.गावात भिल्ल आदिवासी वस्ती असून गावाची ४५० लोकसंख्या आहे. गावात एकही पिठाची गिरणी नाही व दुकान दवाखाना नाही. त्यामुळे ग्रामस्थ महिलांना शेजारील पुनगाव येथे जाणे - येणे करावे लागते. गावास जोडणारा रस्ता वारंवार मागणी करूनही झाला नाही. सद्यस्थितीत पावसाळ्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून या बहुसंख्य आदिवासी रहिवासी असलेल्या या गावाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. पिठाची गिरणी किराणा दुकान नसल्याने गावकऱ्यांना बाहेरगावी जावे लागत. त्यातच आजारी रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्यास कोणतेही वाहन रस्त्यांवर चालू शकत नाही. यामुळे आमचे जिणे असाह्य झाले आहे. यासाठी तत्काळ रस्ता करावा व गावचे पुनर्वसन करावे अशी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनावर ग्रा प सदस्य चिंतामण पाटील, अनिल परदेशी, देवराज वाघ, सुभाष भिल, राजाराम पाटील, यशोदाबाई भिल, अक्कबाई भिल, मंगलाबाई भिल, मीराबाई मराठे, इंदुबई भिल, सुनंदा मराठे, अक्कबाई भीमराव भिल, आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.दरम्यान तालुक्यात सर्वत्र विकास कामांचा झंझावात चालू असताना मांडकी गावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत असून गावाकडे कुणीही अधिकारी तसेच राजकीय मंडळी फिरकत नाही.यामुळे आमदार तसेच जि. प. सदस्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.