शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मन्याड धरण निम्मेच भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 17:31 IST

‘मन्याड’ परिसरातील २२ गावांचे जलसंकट मोचक असलेले मन्याड धरण यावर्षी निम्मेच भरले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास ऐक आवर्तन शक्यपाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणारआठ वर्षात फक्त दोनदा मन्याड धरण भरले १०० टक्केतीन वर्षामध्ये पन्नाशी तर दोन वर्षामध्ये १२ ते १८ टक्के भरलेगेल्या वर्षी शून्याच्याही खाली

विजय पाटीलआडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ‘मन्याड’ परिसरातील २२ गावांचे जलसंकट मोचक असलेले मन्याड धरण यावर्षी निम्मेच भरले आहे. यामुळे परिसरातील गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. तसेच पाहिजे त्या प्रमाणात खरीप हंगामही घेता येणार नाही. परिसरातील शेतकरी यावर्षी चांगली आशा बाळगून होता. परंतु त्याच्या आशेवर संपूर्ण पाणी फिरल्याने खरीपावरच त्याला समाधान मानावे लागणार आहे.एका महिन्यातच धरण ५० टक्केपावसाळा जरी चार महिन्यांचा असला तरी तो कुठे कधी व किती होईल हे कुणालाही सांगता येत नाही. याचा प्रत्यय यावर्षी जवळजवळ सर्वांनाच आला. सगळीकडे पाऊसच पाऊस नदी, नाले, धरणे तुडूंब भरून वाहू लागले तर काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली. याला अपवाद ठरला तो मन्याड परिसर. पावसाळा सुरू झाल्यापासून एकसारखा निसर्गाकडे आस लावून बसलेला शेतकरी पोळ्यापर्यंत परिसरावर कुठेही उपयुक्त साठा हा जवळजवळ ५० टक्क्यांच्या आसपास आहे. शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास व पाणी काटकसरीने वापरल्यास एक आवर्तन चारा पिकासाठी व पिण्यासाठी देणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परतीचा पाऊस धरण परिसरात झाल्यास धरण १०० टक्के भरल्यास दोन/तीन आवर्तन देण्यास कुठलीही अडचण राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.मन्याड धरणाची क्षमता १९०५ द.ल.घ.फु.आहे. यातील मृत साठा ४८३ द.ल.घ.फु. आहे. या धरणाचे बुडीत क्षेत्र २१७७ एकर म्हणजे ८७१ हेक्टर त्यापैकी ४०० हेक्टर क्षेत्र हे लिफ्टवर भिजते आणि ६५०० हेक्टरात खरीप व रब्बी हंगाम निघतो.कोणत्या वर्षी धरण किती टक्के भरलेसन २०१२-१३ मध्ये १२ टक्केसन २०१३-१४ मध्ये १०० टक्केसन २०१४-१५ मध्ये ४९ टक्केसन २०१५-१६ मध्ये १८ टक्केसन २०१६-१७ मध्ये १०० टक्केसन २०१७-१८ मध्ये ६३ टक्केसन २०१८-१९ मध्ये शून्य टक्केसन २०१९-२० मध्ये ५० टक्के

टॅग्स :water shortageपाणीकपातChalisgaonचाळीसगाव