शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

तीन वर्षानी खळखळला मन्याड कालवा

By admin | Updated: January 9, 2017 00:53 IST

शेतक:यात समाधान : रब्बीच्या पिकांना होणार फायदा, शेतांमध्ये आले कामांना उधाण

आडगाव, ता.चाळीसगाव : यंदा मन्याड धरण 100 टक्के भरल्याने अखेर तीन वर्षानी मन्याडचे कालवे आवर्तन सुटल्याने खळाळताना दिसत आहे.मन्याड  परिसर तीन वर्षापासून पाटाचे पाण्यापासून वंचित होता. लागोपाठ तनी वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देत 2013 नंतर  निसर्गाच्या कृपेने 2016 मध्ये ऑक्टोबर महिन्यात मन्याड धरण 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतक:यांच्या आशा  पल्लवित झाल्या. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, पशूपालक बेजार झाला होता.  निसर्गाने मात्र साथ दिल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवित झाल्या.असा वाहतो पाण्याचा प्रवाह मन्याड धरण 100 टक्के भरल्यावर रब्बी हंगामासाठी  त्याचा चांगला उपयोग होतो. खरीप पिकाने धोका दिल्यास रब्बी हंगाम तारतो हा आजपावेतोचा शेतक:यांचा अनुभव आहे. मन्याड धरणातून  पाणी सोडल्यावर त्याचे दोन भागात  विभाजन केले जाते. चारी क्र. 1 ते 6 याचा एक भाग व 6 ते 12 याचा दुसरा भाग. त्यामुळे प्रथम एका सेक्शनला पाणी सोडण्यात येते.   धरणावरील विसंबून असणा:या 22  पैकी 11 ते 12 खेडय़ांचा पहिला एक टप्पा व उर्वरित खेडय़ांचा दुसरा टप्पा.  अशा रितीने पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे नियोजन केले जाते. यात सेक्शन 1 ते 6 साठी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून  एस.बी. पाटील यांच्या अधिपत्याखाली काम होते तर दुस:या टप्प्यात 6 ते 12 सेक्शनसाठी सी.एन.पाटील हे कामकाज पाहतात. धरणातून पाणी सोडल्यावर नांद्रे, अलवाडी, देशमुखवाडी, ब्राrाणशेवगे, पिंप्री, शिरसगाव, तळोदा, टाकळी, आडगाव, चिंचखेडे, देवळी, डोणदिगर, उंबरखेड गावाचा एका टप्प्यात समावेश होतो. सद्य:स्थितीत चारी क्रमांक 10 व 11 पाणी सोडण्यात आले आहे.रब्बी हंगाम  हुकल्याने नाराजीधरण भरुन यावर्षी प्रथमच जानेवारीत पाणी मिळत असल्याने रब्बीचा हंगाम गहू, हरबरा, भुईमूग घेण्यापासून शेतकरी मुकला. याला कारण म्हणजे  पाटबंधारे विभागासह शेतकरीही तेवढेच जबाबदार आहेत. कारण पाटबंधारे विभागाने  चा:या लवकर दुरुस्त केल्या नाही म्हणून पाणी लांबले. शेतक:यांनीही अधिकाधिक पाणी अर्ज भरले नाही व स्वत:च्या पाटचा:या दुरुस्त केल्या नाही म्हणूनच शेतकरी रब्बी हंगामापासून वंचित राहिला. (वार्ताहर)पाटचारी दुरुस्ती झाली युध्दपातळीवर‘लोकमत’ने मन्याडचे आवर्तन लांबणीवर असे वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची  पाटबंधारे विभगाने  दखल घेत युध्द पातळीवर चा:यांची दुरुस्तीचे काम हाती घेतले. चा:यांची दुरुस्ती हाती घेतल्याने पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ात पाणी मिळणार असाही अंदाज वर्तविला होता. आणि  पाटबंधारे विभागाने  दिवस-रात्र एक करून पहिल्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी धरणाचे गेट उघडले. यासाठी  प्र. शाखाधिकारी, हेमंत पाटील, जे.डब्ल्यू. सूर्यवंशी, एस.बी.पाटील, सी.एन.पाटील व  कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. असा होणार लाभसध्या चारी क्र.10 व 11 ला पाणी सोडण्यात आले असून 6 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले. ते दुस:या दिवशी म्हणजे  7 रोजी सायंकाळी 6 वाजता आडगाव शिवारात पोहचले. कपाशीला पाणी भरुन फरदड घेण्याच्या तयारीत शेतकरी आहे तर काही शेतकरी उन्हाळी बाजरी घेण्याच्या तयारीत आहेत. पाणी सुटल्यामुळे सध्या शेता शेतांमध्ये शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.