शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

ममुराबादची पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावाला तापी नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सामूहिक योजनेच्या थकीत वीजबिलाची रक्कम सुमारे ५० लाखांपर्यंत पोहोचल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : गावाला तापी नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या सामूहिक योजनेच्या थकीत वीजबिलाची रक्कम सुमारे ५० लाखांपर्यंत पोहोचल्याने महावितरणकडून ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, थकीत बिल वेळेवर भरले न गेल्यास वीजपुरवठा केव्हाही खंडित होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाच्या तोेंडचे पाणीच पळाले आहे.

ममुराबाद व परिसरातील नांद्रा खुर्द, खापरखेडा, धामणगाव, आवार व तूरखेडा आदी काही गावांसाठी सुमारे ३५ वर्षांपूर्वी तापी नदीवर सामूहिक योजना कार्यान्वित करण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेली सदरची योजना गेल्या वर्षभरापासून ममुराबाद ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पाणीपुरवठा योजनेसोबत कित्येक वर्षांपासून थकीत असलेले महावितरण कंपनीचे बिलसुद्धा ग्रामपंचायतीच्या गळ्यात टाकण्यात आले आहे.

विशेषतः जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्याद्वारे आपल्या अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रकार पद्धतशीरपणे केल्याचे दिसून आले आहे. संबंधित विभागाने अनेक वर्षे थकीत वीजबिल भरण्यास काणाडोळा केला, तेव्हा महावितरणनेही काहीच कारवाई केली नाही.

ग्रामपंचायतीकडे जेमतेम वर्षभरापासून पाणी योजना आली असताना मात्र आता महावितरणने थकीत बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे महावितरणने बजावलेली बिले अजूनही जिल्हा परिषदेच्या नावाची आहेत.

------------------------

आता १० लाख रुपये तरी भरा...

ग्रामपंचायतीला महावितरणकडून २५ लाख ७३ हजार, २३ लाख ६५ हजार तसेच २ लाख ४५ हजार रुपयांची तीन बिले बजावण्यात आली आहेत. त्यापैकी जवळपास ५० लाख रुपयांची थकबाकी फक्त नांद्रा येथील पाणीपुरवठा योजनेची आहे, तर उर्वरित रक्कम ममुराबाद येथील गावहाळ विहिरीच्या पंपाची असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीने थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी हफ्ते पाडून देण्याची मागणी केल्यावर जळगाव ग्रामीण उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी किमान १० लाख रुपये भरण्यास संमती दिली आहे. तेवढ्या रकमेची तजवीज करताना तरीही ग्रामपंचायतीच्या चांगलेच नाकीनव आले आहेत.

---------------------------------

(कोट)....

नांद्रा खुर्द येथील पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल तातडीने भरण्याविषयी महावितरणकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदरचे बिल वेळेवर न भरल्यास योजनेचा वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाईसुद्धा होऊ शकते. मात्र, ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी कर भरल्यास कारवाई टळेल.

- हेमंत चौधरी, सरपंच, ममुराबाद

-----------------