शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

ममुराबादला अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे वेळोवेळी गांभीर्याने लक्ष न दिल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अस्वच्छतेमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे वेळोवेळी गांभीर्याने लक्ष न दिल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीत चार ते पाच नियमित सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतानाही नवीन भरती प्रक्रिया रखडली आहे. अशा परिस्थितीत गावातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीला रोजंदारीवर मजूर मिळणेसुद्धा आता दुरापास्त झाले आहे. बसस्थानकासह गावातील मुख्य चौक व रस्त्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून सफाई झालेली नाही. सगळीकडे प्लॅस्टिक कागद, कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मोकळ्या जागेत ग्रामस्थांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांना घरात बसणे कठीण होते. सार्वजनिक शौचालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही ‘डंपिंग ग्राऊंड’ निर्माण झाले असून त्याकडे ग्रामपंचायतीने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. कचऱ्याची समस्या वेळीच निकाली न काढल्यास गावात साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

फोटो कॅप्शन - ममुराबाद येथे बहुतांश वॉर्डात नियमित सफाईअभावी असे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.