शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

मालती नेहतेंच्या वारसांना मिळणार ५ लाखाची नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : भुसावळ येथील मालती नेहेते या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी निकाल देताना जिल्हा रुग्णालयाचा ...

जळगाव : भुसावळ येथील मालती नेहेते या वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी निकाल देताना जिल्हा रुग्णालयाचा निष्काळजीपणा आढळून आला. नेहेते यांच्या वारसांना पाच लाखांची नुकसान भरपाई निकाल लागल्यापासून चार महिन्यात शासनाने अदा करावी, असा निर्णय दिला आहे.

मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने जळगाव जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले होते़ कोरोना काळात जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून उपचारासाठी दाखल असलेल्या मालती नेहेते (८२, रा. भुसावळ) या २ जून २०२० रोजी रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर १० जूनला नेहेते यांचा मृतदेह रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळून आला होता. या घटनेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

जनहित याचिका केली दाखल

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मालती नेहेते यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे नेहेते यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कमला बिऱ्हाडे (रा.अमळनेर) आणि रफीक तडवी (रा.उटखेडा, ता. रावेर) यांनी औरंगाबाद खंडपीठात २५ जून २०२० ला जनहित याचिका दाखल केली. यात नेहेते यांच्या वारसांना ३० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती.

खंडपीठाने दिला निकाल

औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती श्रीकांत कुळकर्णी व न्या. एस.व्ही. गंगापूरवाला यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर नुकताच या प्रकरणी निकाल दिला आहे. यात राज्य शासनाने मयत मालती नेहेते यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. ही भरपाई निकालापासून चार महिन्यात देण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर घडलेल्या घटनेच्या चौकशीबाबत नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आल्या दोषींवर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने कार्यवाही करावी, असेही म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. गायत्री सिंग व अ‍ॅड. अंकित कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.

खंडपीठाने चांगला निर्णय दिला असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. या निकालातून नेहेतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात रुग्णाला योग्य उपचार मिळणे आवश्यक असल्याचे वारंवार न्यायालयाने म्हटले आहे.

- अ‍ॅड. अंकित कुळकर्णी, याचिकाकर्त्यांचे वकील