शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या जि.प.सदस्यांचा अपघात घडविणा:या ‘भाऊ’चा शोध घेतोय? : दिलीप वळसे पाटील

By admin | Updated: April 15, 2017 16:39 IST

अपघात कुणी घडविला याची माहितीदेखील घेतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले

 जळगाव,दि.15- : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी सभागृहात अनुपस्थित राहून एक प्रकारे विरोधकांना किंवा भाजपाला मदत करणा:या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना अपात्र केले जाईल. यासंदर्भात कुठलीही गय केली जाणार नाही. तसेच या सदस्यांचा अपघात झाल्याचे सांगितले जाते. हा अपघात कुणी घडविला याची माहितीदेखील घेतोय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले. 

जि.प.अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य गैरहजर राहीले होते. त्यांचा नाशिकनजीक अपघातही झाला होता., असा मुद्दा वळसे पाटील यांच्याकडे उपस्थित केला असता त्यांनी या तिन्ही सदस्यांनी केलेले कृत्य योग्य नाही. त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही वळसे पाटील म्हणाले. 
काँग्रेस भाजपासोबत जाणे चुकीचे
जि.प.मध्ये काँग्रेसचे सदस्य भाजपासोबत गेले.. निवडणूक लढताना मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होती.., आता संघर्षयात्रेतही ते पुन्हा आपल्यासोबत आले.. पण भाजपासोबत जाणे हा आपला विश्वासघात नाही का.., असा मुद्दा मांडला असता.. काँग्रेसचे सर्वच सदस्य जर भाजपासोबत गेले असतील तर ते चुकीचे आहे.. आता संघर्षयात्रा दोन्ही काँग्रेसने एकत्र काढायची असल्याचा निर्णय झाल्याने आम्ही सोबतच आहोत., जळगाव जि.प.त भाजपासोबत काँग्रेस गेली.. याबाबत मात्र आमचे जिल्हाध्यक्ष बोलतील.., असेही वळसे पाटील यांनी सांगितले. 
मुख्यमंत्र्यांनी शाश्वत शेतीचा कार्यक्रम आधी सांगावा
कजर्माफीच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्र्यांनी मागील दोन अधिवेशनांमध्ये सकारात्मक भूमिका घेतली नाही.. ते जलयुक्त शिवार अभियान, शाश्वत शेतीचा मुद्दा मांडायचे.. पण त्यांनी शाश्वत शेतीचा कार्यक्रम सांगावा.. जलयुक्त शिवार अभियान पूर्वीही महात्मा फुले यांच्या नावाने आमच्या काळात होते.. फक्त या योजनेचे नाव बदलले, असेही वळसे पाटील म्हणाले.
शिवसेना कजर्मुक्तीच्या बाजूने
शिवसेनेचे सदस्य हे कजर्मुक्तीच्या बाजूने आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सेनेने कजर्माफीची भूमिका मांडली. आपण अल्पमतात येऊ म्हणून भाजपाने 19 आमदारांचे निलंबन केले व अधिवेशन पार पाडून नेले. आता मात्र सेनेचे नेते मुंबईत पंतप्रधानांसोबत जेवण करून आले आहे. त्यांची भूमिका आता बदलली का, ते सांगता येणार नाही, असेही वळसे पाटील गमतीने म्हणाले.