शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

दैनंदिनीत साधे बदल करा आणि निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

कोरेाना आजाराचे सर्व थैमान सुरू असताना प्रतिकारक्षमतेबाबत अनेक चर्चा होत आहेत. यात काय खावे, काय खाऊ नये, काय करावे, ...

कोरेाना आजाराचे सर्व थैमान सुरू असताना प्रतिकारक्षमतेबाबत अनेक चर्चा होत आहेत. यात काय खावे, काय खाऊ नये, काय करावे, अशा अनेक समजुती-गैरसमजुती समाजमाध्यमातून समोर येत आहेत. मात्र, दैनंदिन जीवन जगत असताना त्यात काही सकारात्मक बदल केल्यास आपण निरोगी आणि तणावमुक्त राहू शकतो, असा सल्ला शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिला आहे... त्यांनी सांगितलेली ही जीवनशैली....

सकाळी साधारण सहा वाजेपर्यंत उठावे.. लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठून शौचास जाणे, तेथून आल्यानंतर पाणी पिणे, व्यायाम करणे, व्यायाम करतानाही उन्हाळ्यात अधिक कष्टाचे व्यायाम टाळावे, वॉकिंग करू शकता, नियमित शारीरिक हालचाली कराव्यात, प्राणायाम, योग करावा. यानंतर साधारण ९ ते १०:३० वाजेपर्यंत तुमचा नाश्ता होणे आवश्यक आहे. नाश्ता कधीच टाळायचा नाही. कारण हा काळ ऊर्जेचा काळ असतो. तुमच्या पोटात अन्न असेल तरच तुमची प्रतिकारक्षमता चांगली. सकाळी सकाळी नाश्त्यात थालीपीठ खाऊ शकता, बाहेरचे व जंक फूड टाळावेत. दुपारचे जेवण हे साधारण एक ते दीड वाजेच्या आसपास घेऊ शकतात. दुपारचे जेवण हे नेहमी राजासारखे असावे, दुपारी मात्र थोडे हलके खावे. सायंकाळी ७ पर्यंत रात्रीचे जेवण घ्यावे. जेवणानंतर साधारण दोन तास झोपू नये. यामुळे पचन चांगले होते. रात्री हलके अन्न खावे.

विशेष काय घ्यावे

कोरेानासाठी प्रतिबंधक म्हणून तुम्ही सकाळी तुळस, अद्रक आणि थोडे मध यांचे गरम पाणी घेऊ शकता. हे नसेल तर कोमट दुधात हळद टाकून प्यावे, प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी तुम्ही गुळवेल, आवळा, ब्राह्मी, शतावरी, अश्वगंधा यांचे सेवन करू शकता. गरम पाण्याची सकाळी वाफ घेऊ शकतात. आयुष काढा घेऊ शकता. ग्रीष्म ऋतूत शुष्कपणा येत असल्याने आहारात तूप घ्यावे. दिवसातून सरबत, कैरीचे पन्हे सेवन करावे, ऋतूत येणारी फळे खावी, यात टरबूज घ्यावे. दिवसभर अधिकाधिक पाणी प्यावे. बाहेर जाताना काही खाऊन व भरपूर पाणी पिऊनच जावे.

कोरोनात प्रतिकारक्षमता तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. ज्यांची प्रतिकारक्षमता कमी त्यांना लवकर लागण होत आहे. त्यामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काही थोडे बदल आपल्याला आपल्या जीवनात करायचे आहेत. त्यामुळे तुमचे मनोबलही वाढेल व तुम्ही निरोगीही राहाल.

डॉ. मिलिंद कांबळे, सहायक प्राध्यापक, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय