जळगाव : महापालिकेत सुडाचे राजकारण सुरू आहे. मनपाच्या अधिका:यांना राजकारणी कठपुतली सारखी वागणूक देत आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी हे ‘ मनपा आयुक्तांची नियुक्ती ही जळगावकरांचे वाटोळे करण्यासाठी केली असल्याचे वक्तव्य करतात, असा धक्कादायक गौप्यस्फोट नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत केला. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर आरोप केल्याने भाजपच्या ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे, अनिल देशमुख व विजय गेही या सदस्यांनी सभात्याग केला. महापालिकेच्या दुस:या मजल्यावरील सभागृहात स्थायी समितीची सभा सभपती नितीन बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंचावर उपायुक्त प्रदीप जगताप, नगरविकास सचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. आमदाराचा केला निषेध ‘ लढ्ढा यांनी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी यांचे नाव न घेता एका पक्षाचे आमदार म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर अनंत जोशी यांनी आमदारांचा निषेध करताच, भारतीय जनता पार्टीच्या ज्योती चव्हाण सभेत आक्रमक झाल्या. त्यांनी जोशी यांना येवढे असेल तर आमदाराचे नाव जाहीर करा, असे सांगितले. सुरुवातीला जोशी यांनी हे उत्तर देण्याचे आमचे उत्तरदायित्व नाही. पण ती वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यानंतर चव्हाण या अधिकच संतप्त झाल्या. तेव्हा नितीन लढ्ढा यांनी स्वत: उभे राहून तुम्हाला नावच हवे आहे, तर हे घ्या, असे म्हणत आमदार गुरूमुख जगवाणी यांनी हे विधान चार दिवसांपूर्वी गोरजाबाई जिमखाना येथे केल्याचे स्पष्ट केले. यानंतर भाजपच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाची उणी-दुणी काढण्यास सुरुवात केली. मात्र, लढ्ढा व जोशी हे आक्रमकपणे भाजपच्या सदस्यांवर तुटून पडले. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना सभात्याग करावा लागला. सभागृहाबाहेर पडण्यापूर्वी अनंत जोशी यांनी तुमच्या आमदार, खासदारांनी मनपाच्या प्रशासकीय कारभारात मनपातील अधिकारी राजकारण्यांच्या हातचे बाहुले शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. अशा परिस्थितीत मनपाच्या राजकारणात आमदार व खासदारांचा हस्तक्षेप वाढत आहे. मनपाचे अधिकारीही या राजकारण्यांच्या दबावाला बळी पडत आहेत. किंबहुना काही अधिकारी तर या राजकारण्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत. सभेत स्वच्छतेच्या ठेक्याबाबत धोरणात्मक निर्णय झालेला असतानाही दोन ते तीन महिने उलटल्यानंतरही कार्यवाही होत नसेल तर सभा चालविण्यात काहीही अर्थ नसल्याचे लढ्ढा यांनी सांगितले. स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पुढील सभा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी सभेत केली. घाणेरडे राजकारण करू नका; हिंमत असेल तर मैदानात उतरा.. दिशाहीन झालेल्या मनपा प्रशासनाला दिशा देण्यात मनपातील अधिकारी कमी पडत आहेत. त्यात एका पक्षाचे आमदार
आयुक्तांची नियुक्ती वाटोळे करण्यासाठीच
By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST