शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

देखभालीअंती चाचणी हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:49 IST

बेलगंगा साखर कारखाना : खरीददार कंपनीकडून गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू

ठळक मुद्देकारखाना सुरू करण्याच्या हालचाली भुमीपूत्रांचा पुढाकारशेतकºयांच्या वाढल्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना घेणाºया कंपनीने तो सुरू करण्याच्या जोरदार हालचालीस प्रारंभ केला आहे. यासाठी देखभालीअंती चाचणी हंगाम घेतला जाणार आहे.चार स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत अंबाजी ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ. अभिजित पाटील यांनी मात्र आठ वर्षांपासून बंद असलेला बेलगंगा कारखाना विकत घेऊन तो सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी न्यायालयाने कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठवल्याने ऊस उत्पादकांसह सभासद व कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चित्रसेन पाटील यांनी गुंतवणूकदारांशी संवाद सुरू केला असून कारखान्याचे मेन्टनस करून ट्रायल सिझन घेण्याचे नियोजन केले असल्याचे 'लोकमत'शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.यंत्रे बंद असल्यामुळे कारखान्याचे मेन्टनस करावे लागणार असून यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मेन्टनस झाल्यानंतर ट्रायल सिझन घेणे शक्य होईल. याचबरोबर भांडवल उभारणीस तीन ते चार महिने लागतील, अर्थात पुढच्या गळीत हंगामात कारखान्याची यंत्रे निश्चितपणे धडधडतील, अशी आशा आहे. कंपनी स्थापन करून सर्वसामान्यांकडून शेअर्सरूपाने बेलगंगा कारखान्याची खरेदी करण्यासाठी पैसा उभा केला जात आहे. कारखान्यावर जिल्हा बँकेसह इतर अशी ८० कोटींहून अधिक देणी आहे.जल्हा बँकेला या व्यवहारापोटी ३९ कोटी २२ लाख रुपये अदा करावयाचे आहेत. यासाठी गुंतवणुकदारांकडून भांडवल उभारले जात आहे.पाच लाख मेट्रिक टन ऊस उपलब्धचाळीसगाव तालुक्यात ऊसाचे मोठे लागवड क्षेत्र आहे. बेलगंगेसाठी लागणा-या ३ लाख मेट्रीक टन ऊसा नंतरही ऊस शिल्लक राहतो. बेलगंगेत एका हंगामात अडीच लाख मेट्रीकटन ऊसाचे गाळप होते. यामुळे १०० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होऊन ऊसतोड मजूर व पाचशेहून अधिक कामगारांना हक्काचा रोजगारही मिळतो. सद्यस्थितीत तालुक्यात पाच लाख मेट्रीक टन गाळप होईल, एवढा ऊस उपलब्ध आहे.आमदार उन्मेष पाटील यांनी बेलगंगेचा मुद्दा तापवूनच राजकारणात एन्ट्री केली. मांदुर्णे ते गुढे या त्यांच्या पदयात्रेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले. २०१४ ची विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर चित्रसेन पाटील यांच्यासह त्यांच्या तीन सहकाºयांनी कारखाना विकत घेतला. त्यामुळे येत्या काळात तालुक्याच्या राजकारणाची समीकरणे नव्या बदलाच्या उंबरठ्यावर येतील असा मतप्रवाह आहे.