शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

देखभालीअंती चाचणी हंगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:49 IST

बेलगंगा साखर कारखाना : खरीददार कंपनीकडून गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू

ठळक मुद्देकारखाना सुरू करण्याच्या हालचाली भुमीपूत्रांचा पुढाकारशेतकºयांच्या वाढल्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठविल्याने हा कारखाना घेणाºया कंपनीने तो सुरू करण्याच्या जोरदार हालचालीस प्रारंभ केला आहे. यासाठी देखभालीअंती चाचणी हंगाम घेतला जाणार आहे.चार स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत अंबाजी ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन चित्रसेन पाटील, व्हाईस चेअरमन रवींद्र्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ. अभिजित पाटील यांनी मात्र आठ वर्षांपासून बंद असलेला बेलगंगा कारखाना विकत घेऊन तो सुरू व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी न्यायालयाने कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवरील स्थगिती उठवल्याने ऊस उत्पादकांसह सभासद व कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चित्रसेन पाटील यांनी गुंतवणूकदारांशी संवाद सुरू केला असून कारखान्याचे मेन्टनस करून ट्रायल सिझन घेण्याचे नियोजन केले असल्याचे 'लोकमत'शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.यंत्रे बंद असल्यामुळे कारखान्याचे मेन्टनस करावे लागणार असून यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मेन्टनस झाल्यानंतर ट्रायल सिझन घेणे शक्य होईल. याचबरोबर भांडवल उभारणीस तीन ते चार महिने लागतील, अर्थात पुढच्या गळीत हंगामात कारखान्याची यंत्रे निश्चितपणे धडधडतील, अशी आशा आहे. कंपनी स्थापन करून सर्वसामान्यांकडून शेअर्सरूपाने बेलगंगा कारखान्याची खरेदी करण्यासाठी पैसा उभा केला जात आहे. कारखान्यावर जिल्हा बँकेसह इतर अशी ८० कोटींहून अधिक देणी आहे.जल्हा बँकेला या व्यवहारापोटी ३९ कोटी २२ लाख रुपये अदा करावयाचे आहेत. यासाठी गुंतवणुकदारांकडून भांडवल उभारले जात आहे.पाच लाख मेट्रिक टन ऊस उपलब्धचाळीसगाव तालुक्यात ऊसाचे मोठे लागवड क्षेत्र आहे. बेलगंगेसाठी लागणा-या ३ लाख मेट्रीक टन ऊसा नंतरही ऊस शिल्लक राहतो. बेलगंगेत एका हंगामात अडीच लाख मेट्रीकटन ऊसाचे गाळप होते. यामुळे १०० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होऊन ऊसतोड मजूर व पाचशेहून अधिक कामगारांना हक्काचा रोजगारही मिळतो. सद्यस्थितीत तालुक्यात पाच लाख मेट्रीक टन गाळप होईल, एवढा ऊस उपलब्ध आहे.आमदार उन्मेष पाटील यांनी बेलगंगेचा मुद्दा तापवूनच राजकारणात एन्ट्री केली. मांदुर्णे ते गुढे या त्यांच्या पदयात्रेने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले. २०१४ ची विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर चित्रसेन पाटील यांच्यासह त्यांच्या तीन सहकाºयांनी कारखाना विकत घेतला. त्यामुळे येत्या काळात तालुक्याच्या राजकारणाची समीकरणे नव्या बदलाच्या उंबरठ्यावर येतील असा मतप्रवाह आहे.